HW News Marathi
महाराष्ट्र

#DelhiVoilence : सोनिया गांधींच्या ‘या’ आरोपाला प्रकाश जावडेकरांचे ‘हे’ प्रत्युत्तर

नवी दिल्ली | दिल्लीतील हिंसाचार हा पूर्वनियोजित कट होता. दिल्लीत झालेल्या हिंसाचाराची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस अध्याक्षा सोनिया गांधी यांनी केली होती. दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधींनी आज (२६ फेब्रुवारी) पत्रकार परिषद घेत भाजपवर हल्लाबोल केला. सोनिया गांधींनी भाजप सरकारवर केले आरोपचा खंडण करत भाजपच्या वतीने केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेत चोख प्रत्युत्तर दिले.

जावडेकर म्हणाले की, “दिल्लीतील हिंसाचारावर काँग्रेस गलिच्छ राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे . काँग्रेसच्या या धोरणामुळे पोलिसांचे मनोबल खचत आहे. गृहमंत्री अमित शाह सर्व पक्षांशी चर्चा करून परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे जावडेकरांनी यावेळी नमुद केले.”

सोनिया गांधी म्हणाल्या की, भाजप नेत्यांच्या चेतावणीखोर वक्तव्यामुळे दिल्ली हिंसाचारचा आगडोब उसळला. यामुळे दिल्लीत झालेल्या हिंसाचाराची जबाबदारी स्वीकारून अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सोनिया गांधी यांनी पत्रकार परिषदेत केली होती. यावेळी सोनिया गांधी दिल्ली हिंसाचारावरुन केंद्र सरकार, गृहमंत्री अमित शाह, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवार यांना काही प्रश्न विचारले आहेत.

सोनिया गांधींनी दिल्ली हिंसाचारावर विचारले पाच प्रश्न

१. गृहमंत्री रविवार कुठे होते आणि काय करत होते?

२. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल रविवारपासून काय करत होते?

३. दिल्ली निवडणुकीनंतर गुप्तचर यंत्रणांनी कोणती माहिती दिली? त्यावर काय कारवाई झाली?

४. हिंसाचार घडला त्या भागात किती पोलीस बंदोबस्त होता?

५. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानतंर निमलष्करी दलाला पाचारण का केलं नाही?

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“अजित पवारांचे विचार चिंधी”, निलेश राणेंचे पुन्हा टीकास्त्र

News Desk

मी आरक्षणाच्या लढ्यात तुमच्यासोबत, कोल्हेंचे धनगर समाजाला आश्वासन

News Desk

उत्तर महाराष्ट्राचा दौरा अर्धवट, नाना पटोले तातडीने दिल्लीला रवाना होणार

News Desk