HW News Marathi
महाराष्ट्र

“अजित पवारांचे विचार चिंधी”, निलेश राणेंचे पुन्हा टीकास्त्र

मुंबई | माजी खासदार निलेश राणे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. देशात मोगलाई आहे का या अजित पवारांच्या प्रश्नावरुन निलेश राणेंनी निशाणा साधला आहे. “अजित पवारांना महाराष्ट्रात मोगलाई आहे का असं म्हणायचं होतं, चुकून देशात म्हणाले, हेराफेरी करुन पद मिळाल्यावर असं होतं”, असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे. इतकंच नाही तर “परवा भाषणात कुठेतरी मी अनेकवेळा आमदार झालो पण जॅकेट घातलं नाही असंही अजित पवार म्हणाले, याला चिंधी विचार म्हणतात साहेब, तुम्ही उपमुख्यमंत्री आहात महाराष्ट्राच्या हिताचे काहीतरी बोला”, असा घणाघात निलेश राणे यांनी केला.

काय म्हणाले अजित पवार?

अजित पवार काल अमरावती दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनावरुन मोदी सरकारवर निशाणा साधला होता. “देशातील शेतकरी आपल्याला मागण्यांसाठी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असताना त्यांच्या वाटेत खिळे ठोकले जातात. शेतकऱ्यांना यापूर्वी कधीही अशाप्रकारची वागणूक मिळाली नव्हती. आता या देशात मोगलाई आली आहे का”, असा संतप्त सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाऊस आला धावून, पैसा गेला वाहून

swarit

मराठा आणि ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत सतत चालढकल का ? भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा राज्य सरकारला सवाल

News Desk

गेली २०-२५ वर्ष कॉंग्रेस-राष्ट्रवादीचीची पालिकेत सत्ता आहे… सुप्रिया सुळेंच्या आरोपावर महापौरांची प्रतिक्रिया!

News Desk