HW News Marathi
महाराष्ट्र

मंत्रिमंडळाच्या बैठकीत निरा डावा-उजवा कालव्याच्या समन्यायी वाटपाचा निर्णय

बारामती | विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या काळात निरा डावा-उजवा कालव्यातील बारामतीकडे जाणारे पाणी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर फडणवीसांनी घेतलेला हा निर्णय मागे घेत, महाविकास आघाडीने काल (१९ फेब्रुवारी) घेतलेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत निरा उजवा आणि डावा कालव्यातील पाण्याचे समन्यायी वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.

निरा देवघर आणि गुंजवणी धरणाचे कालवे कार्यान्वित नसल्यामुळे, शिल्लक राहणारे पाणी निरा उजवा आणि डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्राला समान पद्धतीने देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाचा फायदा दोन्ही कालव्यांच्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना होईल. तसेच भाजपा सरकारच्या काळात इंदापूर, बारामतीचे पाणी बंद केले होते. ते आज महाविकास आघाडी सरकराने निर्णय घेत परत दिल्याबद्दल आनंद आहे. मी या निर्णयाचे स्वागत करतो” अशी प्रतिक्रिया राज्याचे जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी माध्यमांशी बोलताना दिली .

कॅबिनेट बैठकीत झालेल्या निर्णयानुसार डाव्या कालव्यात ५५ टक्के आणि उजव्या कालव्यात ४५ टक्के पाणी सोडण्यात येणार आहे. या निरा डाव्या कालव्याचा लाभ ज्या क्षेत्रात होतो त्यात पुरंदर, बारामती, इंदापूर तालुक्यातील काही गावे येतात, तर उजव्या कालव्याचा लाभ ज्या क्षेत्रात होतो त्यात पंढरपूर, सांगोला, खंडाळा, फलटण, माळशिरस तालुक्यांचा समावेश होतो. दरम्यान. हे सोडण्यात येणारे पाणी पिण्यासाठी, औद्योगिक आणि शेतीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.

निरा देवघर आणि गुंजवणी धरणाचे कालवे कार्यान्वित नसल्यामुळे ज्या पाण्याचा वापर होत नाही ते पाणी समन्यायी तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात निरा उजवा आणि डावा कालवा येथील लाभक्षेत्रास वाटप करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. वाटप करण्यात येणाऱ्या पाण्याचा फायदा दोन्ही कालव्यांच्या क्षेत्रात झालेले नागरीकरण, औद्योगीकरण, कृषीपूरक उद्योग, साखर कारखाने, फळबागांना होईल.

निर्णयाची अधिक माहिती पुढीलप्रमाणे-

निरा देवघर धरणाचे काम २००७ साली पूर्ण झाले असून ११.७३ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा निर्माण झालेला आहे. गुंजवणी धरणात २०१८ सालापासून ३.६९ टीएमसी पाणीसाठा निर्मीत झालेला होता. या दोन्ही प्रकल्पांच्या कालव्याची कामे अपूर्ण असल्याने त्यांच्या नियोजित लाभक्षेत्रात असलेल्या पाण्याचा वापर होऊ शकत नव्हता. ही बाब विचारात घेत महाविकास आघाडीच्या सरकारने या पाण्याचा वापर होण्याच्या दृष्टीने दोन्ही धरणात उपलब्ध असणारे पाणी आणि या पाण्यातून इतर प्रकल्पांची गरज भागल्यावर शिल्लक राहणारे निरा डावा कालवा आणि निरा उजवा कालवा यात समन्यायी तत्वावर वाटप करण्याचा निर्णय घेतला.

कोणत्या क्षेत्राला किती पाण्याचा लाभ होणार

  • दोन्ही कालव्याच्या लाभक्षेत्रामध्ये समन्यायी तत्वावर २४२७ हेक्टर/टीएमसी या प्रमाणात पाणी सिंचनासाठी उपलब्ध होईल.
  • निरा डावा कालव्याच्या लाभक्षेत्रातील पुरंदर व बारामती, इंदापूर तालुक्याला ३७०७० हेक्टर/टीएमसी पाण्याचा फायदा होणार
  • निरा उजव्या कालव्याच्या खंडाळा, फलटण, माळशिरस, पंढरपूर सांगोला तालुक्यांच्या ६५५०६ हेक्टर/टीएमसी पाण्याचा फायदा होणार
  • आठ तालुक्यातील ग्रामीण / शहरी भागाच्या पाणी पुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल.
  • निरा उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील बिगर बारमाही पंढरपूर व सांगोला तालुक्यातील ब्रँच २च्या खालील वितरीकांना उन्हाळी हंगामामध्ये सिंचनासाठी व पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल.
  • दोन्ही कालव्यांच्या लाभक्षेत्रात झालेले नागरीकरण, औद्योगिकरण आणि परिसरातील कृषीपूरक उद्योग जसे साखर कारखाने, दुग्धव्यवसाय, पोल्ट्री फॉर्म आणि फळबागांवर अवलंबून असणारे उद्योग सुरळीतपणे चालू राहतील.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात पहाटेची ॲापरेशन फसल्यानंतर सप्टेंबर महिन्यात ॲापरेशन कमळचा मुहुर्त भोंदू डाॅक्टरांनी दिलाय !

News Desk

‘माझ्याशी संबंधीत कोणत्याही संपत्तीवर टाच किंवा नोटीसही नाही’, ITच्या कारवाईवर अजित पवारांचं स्पष्टीकरण

News Desk

एकनाथ खडसेंची ५ कोटी ७३ लाखांची मालमत्ता ईडीकडून जप्त!

News Desk