HW News Marathi
महाराष्ट्र

आम्ही तुरुंगवासाला घाबरणारे लोक नाहीत; फडणवीसांचा सरकारला इशारा

मुंबई | “आम्ही तुरुंगवासाला घाबरणारे लोक नाहीत  माझा लढा सुरूच राहणार,” असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला दिला आहे. पोलीस बदल्या घोटाळा प्रकरणी फडणवीसांचा पोलिसांनी जबाब नोंदविला. या प्रकरणावरुन आज (१४ मार्च) विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले आहे. भाजप आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत त्यांनी एक स्थगत प्रस्ताव मांडला. यावर उत्तर देताना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले, या प्रकरणात फडणवीसांना गोवण्याचा कोणताही हेतू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

यावेळी फडणवीस म्हणाले, “मी कोणत्या घरातून येतो हे माहिती आहे का?, प्रश्न कुठे बद्दले ही मला माहिती आहे. आणि ते कोणी बदले हेही मला माहिती आहे. त्यांनी काही फरक पडत नाही. त्यांना माहिती नाही. मी कुठेन येतो. माझ्या वडिलांना दोन वर्ष इंदिराजींंनी जेल ठेवले होते. कुठलाही गुन्हा नव्हता. माझ्या काकूंला १८ महिने जेलमध्ये ठेवले होते. त्यांनीही कुठलाही गुन्हा नव्हात केला. त्यामुळे जेल बिलला घाबरणारी आम्ही लोक नाही आहोत. आम्ही जनते करता लढणारे लोक आहोत. त्यामुळे ज्यांनी प्रश्नावली बद्दलींना त्यांनी हे लक्षात घेतली पाहिजे. अशा प्रकारची जी काही भ्रष्टाचाराची मुद्दे आहेत. त्यांच्यावर आम्ही लढतच राहणार आहोत. काही झाले तर लढणार. यावर सरकार, आणि पोलिसांची भूमिका काय असेल. जी काही कायदेशीर लढाई असेल ती लढू.”

फडणवीसांच्या टीकेला वळसे पाटील म्हणाले, “विरोधी पक्षनेत्यांनी केंद्रीय सचिवांना पेन ड्राईव्ह दिला. पोलिसांनी केंद्रीय सचिवांना पत्रे पाठवून तो पेन ड्राईव्ह उपलब्ध करून द्या, अशी मागणी केली आहे. तपास अधिकाऱ्यांना कुणाला चौकशीला बोलवायचे हा अधइकार त्यांचा आहे. फडणवीसांना आधी आम्ही नोटीस दिली होती. त्यासोबत त्यांना प्रश्नावली देखील पाठवली होती. परंतु, त्यांनी त्यावर उत्तर दिले नाही. मग पोलिसांनी नोटीस पाठवली. यात तुमचा जबाब द्याचा हेच होते. या प्रकरणाची अधिकाऱ्यांनी २४ जणांचे जबाब नोंदवला आहे. आणि विरोधकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. पोलिसांनी काही प्रश्न विचारले तर त्यांचे उत्तर द्यायचे की नाही, ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे. विरोध पक्ष नेत्यांना कुठल्याही कटात फसवण्याचा शासनाचा हेतू नाही.”

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एनसीबीच्या कारवाईत १ हजार १२७ किलो गांजा जप्त

News Desk

महाराष्ट्रातील पूरस्थितीची खासदार सुप्रिया सुळेंनी दिली अमित शहांना माहिती….!

Ruchita Chowdhary

‘ठाकरे सरकारचा अहंकार दुर्योधनाच्या अहंकारासारखाच’ विरोधी पक्षाची टीका

Ruchita Chowdhary