HW News Marathi
देश / विदेश

बिंदू चौकात येऊन चर्चेला आम्ही तयार ! हसन मुश्रीफांनी स्वीकारलं चंद्रकांत पाटलांचं ‘ते’ चॅलेंज

मुंबई । ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपने राज्यभर आंदोलन पुकारलं आहे. राज्याच्या विविध भागांत आज (२६ जून) भाजप नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको, चक्काजाम आणि विविध आंदोलनाद्वारे आपला रोष व्यक्त करत आहेत. भाजपच्या सर्व आघाडीच्या नेत्यांनी आपआपल्या भागात चक्का जाम करुन, ओबीसी आरक्षणाची मागणी केली. तर कोल्हापुरातल्या दाभोळकर कॉर्नरवर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी चक्काजाम आंदोलनाचा एल्गार केला होता. आणि या आंदोलनात चंद्रकांत पाटलांसह भाजपच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

भाजपच्या या आंदोलनात पाटील बोलताना म्हणाले होते की, OBC आरक्षण कोणी घालवले असा आरोप जर होत असेल तर कोल्हापुरातल्या बिंदू चौकात कोणत्याही दिवशी चर्चेला तयार आहे. मंत्री छगन भुजबळ आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची चर्चा होऊ द्या. किमान त्यानंतर तरी जनतेच लक्षात येईल की, “ओबीसी आरक्षण नेमकं कुणामुळे रद्द झालं”.

हसन मुश्रिफांचे उत्तर

चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्याला उत्तर देताना राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणालेत की, भाजप सरकारच्या पाच वर्षातील कारकिर्दीत नाकर्तेपणामुळे समाजाचं आरक्षण कसं गेलं आणि समाज रस्त्यावर कसा आला याचे पुरावे मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे आहेत. त्यामुळे चर्चा होऊनच जाऊदेत, आम्ही तयार आहोत, असं सांगत चंद्रकांत पाटील यांनी दिलेलं आव्हान स्वीकारल्याचं हसन मुश्रीफ म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

झारखंडमधूनही भाजप हद्दपार, शरद पवारांची टीका

News Desk

महाराष्ट्रातील भाजप खासदारांची दानवेंच्या घरी महत्वाची बैठक!

News Desk

सर्वोच्च न्यायालयानं खुल्या गुणवंतांना न्याय दिला – अ‌ॅड. गुणरत्न सदावर्ते

News Desk