HW News Marathi
महाराष्ट्र

हिंगणघाटमधील मृत बहिणीला वाचवू शकलो नाही !

मुंबई | हिंगणघाट जळीत प्रकरणातील पीडित तरुणी गेली आठ दिवस मृत्यूशी देत असलेली झूंज आज (१०फेब्रुवारी) ला संपली. पीडितेच्या आरोपीला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळेलच, पण आपल्या घरात असा नराधम निर्माण होऊ न देणे हीच हिंगणघाटमधील मृत बहिणीला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल,’ अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.

पीडितेच्या मृत्यूनंतर या प्रकरणाची तीव्रता आणखी वाढली संतप्त ग्रामस्थांनी हिंगणघाटात रास्तारोकोही केला होता. तर पीडित तरुणीच्या दरोडा गावात बंद पाळण्यात आला आहे. आरोपीला तात्काळ शिक्षा देण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ रस्त्यावर उतरले असून राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. आरोपीला लवकरात लवकर आणि कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांकडून तसेच राजकीय नेत्यांकडूनही केली जात आहे.

पीडितेच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्र्यांनी, मी तिच्या कुटुंबीयांच्या आणि हिंगणघाटवासीयांच्या दुःखात सहभागी आहे, अशी भावना व्यक्त केली. ‘हिंगणघाटमधील बहिणीला नराधमाच्या हल्ल्यापासून आणि नंतर मृत्यूपासून आपण वाचवू शकलो नाही. महाराष्ट्राच्या मातीसाठी ही लाजिरवाणी घटना आहे. या घटनेतील आरोपीला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा लवकरच मिळेल आणि ती इतरांवर जरब बसवणारी असेल. खरंतर आपल्या घरात असा नराधम निर्माण होऊ न देणे हीच त्या बहिणीला खरी श्रद्धांजली ठरेल,’ असेही पवार म्हणाले.

‘अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सरकार अधिक संवेदनशीलपणे व गुन्हेगारांच्या विरोधात कठोरपणे काम करेल. या विकृती विषयी समाजाचेही प्रबोधन झाले पाहिजे. महिलांच्या सन्मानाप्रती समाजानेही जागरूक असले पाहिजे. पोलीस खात्याचा समाजाला आदरयुक्त दबदबा वाटला पाहिजे, मुलींनी देखील काही त्रास झाल्यास तात्काळ तक्रार करावी. एखादी मुलगी वा महिला भीतीने तक्रार करत नसेल तर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून काही आक्षेपार्ह लक्षात आल्यास संबंधितांनी दक्ष राहून त्याबाबत तक्रार करायला हवी,’ अशी अपेक्षा अजित पवारांनी व्यक्त केली.

दरम्यान, राज्य सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली असून पीडितेच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे. तसेच, पीडित तरुणीच्या भावाला सरकारी नोकरी देण्याचे आश्वासनही त्यांनी दिलं आहे. दरम्यान, आरोपीला लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी सरकार शक्य ते प्रयत्न करेल,’ अशी ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिवाळीनंतरच्या धमक्यासाठी “है तैयार हम”, फडणवीसांच्या इशाऱ्यावर नवाब मलिकांचे प्रत्युत्तर

News Desk

खरा मास्टरमाईंड सुनिल पाटील, नवाब मलिकांवर षडयंत्राचा मोहित कंबोज यांचा आरोप

News Desk

मनसेचे मुंबई, पुण्यातील २ मेळावे अचानक रद्द; कारण काय?

News Desk