HW News Marathi
Covid-19

आम्ही १० ऑगस्टपर्यंतची मुदत देतो, नाहीतर…! प्रकाश आंबेडकरांचा सरकारला इशारा

मुंबई |“आम्ही तुम्हाला १० ऑगस्टपर्यंतची मुदत देतो. सर्वकाही सुरू करा. आता आमचा अंत पाहू नका. आम्हाला कायदा मोडायला भाग पाडू नका”, असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू असलेल्या लॉकडाऊनवरून आज (६ ऑगस्ट) ठाकरे सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. “कधी आणि काय सुरु होणार याबाबत शासनाने निश्चित वेळापत्रक जाहीर करावे. राज्य सरकारने आता हा रामभरोसे कारभार थांबवावा नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन करू”, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय घ्यायला शिकावं”, असा खोचक टोलाही प्रकाश आंबेडकरांनी लगावला. “राज्यातील बिकट स्थितीत लोकांचे हाल कधी थांबणार ? दुकाने कधी उघडणार ? एसटी कधी सुरू होणार ? राज्यासमोर महापुराच्या संकटाचे आव्हान असताना कोरोना कोरोना करत बसण्याव्यतिरिक्त महापुराच्या प्रश्नाकडे लक्ष कधी देणार ? केवळ ५ टक्केच लोकांना या विषाणूचा अधिक धोका असताना ९५ टक्के लोकांना वेठीला का धरता ?”, अशी प्रश्नांची सरबत्ती करत प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगावात २०० कोरोना सैनिक सज्ज

News Desk

पुणेकरांनो लॉकडाऊन होणार नाही मात्र निर्बंध कडक केले जाणार!

News Desk

जाणून घ्या…मुंबई-पुण्यामधून कोणत्या राज्यासाठी धावणार रेल्वेच्या विशेष ट्रेन

News Desk