HW News Marathi
महाराष्ट्र

‘वेड्यावाकड्या घोषणा करणार नाही आणि केंद्राकडे वेडीवाकडी मागणीही करणार नाही’

कोल्हापूर। जेव्हा जेव्हा राज्यावर संकट येतो तेव्हा तेव्हा केंद्राकडे मदतीची मागणी केली जाते. एवढे हजार कोटी द्या, तेवढे हजार कोटी द्या असं म्हटलं जातं. मात्र मी केंद्राकडे अजून कोणतीही मागणी केली नाही. कारण मी वेड्यावाकड्या घोषणा करणार नाही आणि केंद्राकडे वेडीवाकडी मागणीही करणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरात पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.

वेडीवाकडी मागणी करणार नाही

कोल्हापुरातील पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. संकट आलं रे आलं की केंद्राकडे आर्थिक मदतीची मागणी होते. एवढे हजार कोटी द्या. तेवढे कोटी द्या. मी मागणी केलेली नाही. कारण मी वेड्यावाकड्या घोषणा करणार नाही आणि वेडीवाकडी मागणी करणार नाही. माझ्या राज्याला जे पाहिजेत तेच केंद्राकडे मागेल. माझ्या राज्याला जिथे केंद्राची गरज आहे, तिथेच मदत मागेल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी

विम्याची रक्कम तातडीने मिळावी

केंद्रीय वित्तमंत्री सितारामन यांना विनंती पत्रं लिहिलं आहे. त्यांना आज हे पत्र मिळेल. त्यात विमा कंपन्यांना महसूल विभागाचे पंचनामे ग्राह्य धरून किमान 50 टक्के विमा रक्कम देण्याचे निर्देश देण्याची विनंती अर्थमंत्र्यांना केली आहे. विमा कंपन्या उशिरा येतात. ते कचरा पाहून मदत ठरवतात. पण कंपन्या येईपर्यंत कचरा ठेवणे योग्य नाही. त्यामुळे रोगराई पसरू शकते. म्हणून महसूल विभागाचे पंचनामे विमा कंपन्यांनी ग्राह्य धरले पाहिजे, असं ते म्हणाले.

पाणी नियोजनाचा आराखडा तयार करणार

कोल्हापुरात मी दोन तीन ठिकाणी फिरलो. यावेळी नागरिकांनी आपल्या तक्रारी माझ्यासमोर मांडल्या. दरवर्षी या ठिकाणी पूर येतो. आम्ही कष्टाने कमावतो. त्यामुळे संसार उद्धवस्त होतात. त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढा, असं लोक म्हणत आहेत. नद्यांच्या अतिरिक्त पाण्याचं नियोजन करायचं आहे. नुसता अभ्यास नाही तर आराखडा तयार करावा लागणार आहे. खचणारे रस्ते, कोसळणाऱ्या दरडी यामुळे भूगर्भाचाही अभ्यास करायचा आहे, असं त्यांनी सांगितलं.

भिंत बांधावी ही कल्पना, आग्रह नाही

मी भिंत बांधायची कल्पना मांडली होती. पण त्यावर मतमतांतरे असेल तर आपण पुढे सरकता येणार नाही. केवळ भिंत हा पर्याय असू शकतो का असं मी म्हटलं होतं. असेल तर पुढे जाऊ, नसेल तर सोडून देऊ. भिंत बांधावीच हा माझा आग्रह नाही, असंही त्यांनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रेयसीच्या नातेवाईकांकडून प्रियकराचा विष पाजून खून 

News Desk

जयंत पाटलांचा सासरवाडीत पराभव, भाजपचा एकतर्फी विजय

News Desk

लोक पक्ष सोडून जावे अशी वागूण दिली जाते, खडसेंचे भाजपवर खळबळजनक आरोप

News Desk