HW News Marathi
महाराष्ट्र

‘त्यांच्यावर भाष्य न केलेलच बरे’, नाव न घेता शरद पवारांचा राज्यपालांना टोला

मुंबई | “महाराष्ट्रात ज्या पदाची प्रतिष्ठा अनेकांनी सांभाळी. ती प्रतिष्ठा आम्ही ठेवणारच नाही. हा निर्धार ठेऊन कोणी काम करणार असेल. तर त्यांच्यावर भाष्य न केलेलच बरे,” असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसेचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे नाव न घेता टीका केली. शरद पवार यांनी उस्मानाबादच्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना बोलत होते. त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (६ मार्च) पुणे मेट्रोच्या उद्घाटनाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर राज्यपालांना टोला लगावला. 

शरद पवार म्हणाले, “केंद्र सरकार कोणत्या पातळीवर जात असल्याचे दर्शन हे महाराष्ट्रात पाहायला मिळाले आहेत. महाराष्ट्रात ज्या पदाची प्रतिष्ठा अनेकांनी सांभाळी. ती प्रतिष्ठा आम्ही ठेवणारच नाही. हा निर्धार ठेऊन कोणी काम करणार असेल. तर त्यांच्यावर भाष्य न केलेलच बरे. कधी कधी पदावर बसलेल्या लोकांना सुद्धा पद आणि त्या अधिकार यांचे तारतम्य राहत नाही. महाराष्ट्रात कुणीतरी भाषण केले की छत्रपती शिवाजी महाराज मोठे नव्हतेच. महाराजांना कुणीतरी दुसऱ्यांनीच मोठे केले. त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल देखील भाषण केले. तेव्हा लोक म्हणाले आता काय करायेच?, मी म्हटले सोडून द्या ना. काय कुणी विचारणार नाही. त्यावर नको ते बोलल्यानंतर लोक म्हणातात. उगाच त्यांच्या नादी नको लागायला. यात काही अर्थ नाही.”

अलिकडेच्या काळात महत्वाच्या पदावर सन्मानीय व्यक्तीकडून काही अनावश्यक वक्तव्ये – अजित पवार

अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्यपालांची तक्रार केली. अजित पवार म्हणाले “अलीकडे बऱ्याच गोष्टी घडत आहेत. मला पंतप्रधानांना मला एक गोष्टीकडे लक्षात आणून त्यांची आहे. अलिकडेच्या काळात महत्वाच्या पदावर सन्मानीय व्यक्तीकडून काही अनावश्यक वक्तव्ये होत आहेत. ही वक्तव्य महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीला पटणारी नाहीत आणि मान्य देखील नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आणि राजमाता जिजाऊंच्या यांनी संकल्पनेतील स्वराज्य स्थान केले. महात्मा फुले आणि क्रांती ज्योति सावित्रीबाई फुले यांनी देशात स्री शिक्षणाचा पाया रचला. सत्यशोधक विचाराचा प्रसार केला. या महामानवाच्या कार्याच्या विचाराचा वारसा आपल्या सर्वांना महाराष्ट्रमध्ये पुढे घेऊन जायाचा आहे. माझ्या मनात कुणाबद्दलही आकस आणि असूया न ठेवता. विकास कामात राजकारण न करता, हा वारसा, या महामानवांचे विचार आपल्याला पुढेण्याचे आहेत. असुया किंवा द्वेष न ठेवता आपल्याला विकासाचे काम पुढे न्यायचे आहे.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्प होणार! – उद्योगमंत्री उदय सामंत

Aprna

अर्ध्या तासात शरद पवारांनी उभारला कोटींचा निधी

News Desk

बारावीच्या विद्यार्थ्यांचे रोल नंबर जारी, निकाल कधी लागणार विद्यार्थ्यांचं लागलं लक्ष

News Desk