HW News Marathi
व्हिडीओ

“…तर आम्ही महावितरणचं एकही कार्यालय शिल्लक ठेवणार नाही”; Ravikant Tupkar यांचा मोठा इशारा

शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी या मागणीसाठी राजू शेट्टी हे गेल्या १३ ते १४ दिवसांपासून बेमुदत धरणे आंदोलनाला बसले आहेत. मात्र, राजू शेट्टींच्या आंदोलनांची बिलकुलच दखल न घेतल्याने स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. दोनच दिवसांपूर्वी तुपकरांच्या नेतृत्वात सोलापूर – नागपूर महामार्गावर पेठ फाट्याजवळ चक्काजाम आंदोलन सुरू होतं. यावेळी पोलिसांनी तूपकरांना अटक करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी तुपकर व पोलिसांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. तूपकरांना अटक करतांना कार्यकर्ते आक्रमक झाले व कार्यकर्त्यांनी पोलीस गाडी अडवली.पोलीस गाडी समोर कार्यकर्ते झोपल्याने पोलिसांची चांगलीच भंबेरी उडाली. यावेळी बराच वेळ स्वाभिमानी व पोलिसांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतल्यावरच जमाव पांगला व त्यानंतर तुपकरांना अमडापुर पो. स्टेशनला नेण्यात आले होते. ह्याच पार्श्वभूमीवर आमचे बुलढाण्याचे प्रतिनिधी शिवाजी म्हामनकर यांनी बातचीत केलीय रविकांत तुपकर यांच्याशी

#RavikantTupkar #SharadPawar #Farmers #RajuShetti #MahaVitaran #MSEB #MaharashtraPolitics #MahaVikasAaghadi #SwabhimaniShetkariSanghatna #MVA #UddhavThackeray #MahaVitaranOffice

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वबळाचा फायदा कोणाला होणार ?

News Desk

BJP Sambhajiraje यांना पाठिंबा देणार की तिसरा उमेदवार रिंगणात उतरवणार

News Desk

‘तुका’ म्हणे त्याचा संग नको देवा, मुंढेंच्या सततच्या बदलीमागे कारण काय?

Manasi Devkar