HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपने जे पेरले तेच उगत आहे- राज ठाकरे

मुंबईः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा केंद्र व राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. यावेळी त्यांनी व्यंगचित्रांऐवजी शाब्दिक हल्ला चढवला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने जे पेरले तेच आता उगवले आहे. खोटी माहिती पसरवण्यासाठी आणि लोकांची मने कलुषित करण्यासाठी भाजपने सोशल मीडिया नावाचे अस्त्र वापरले, तेच आता त्यांच्यावर बुमरँग झाले आहे, असे ते म्हणाले.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये भाजपकडून दिलेली आश्वासने सत्तेत आल्यानंतरही पाळली नाहीत,याकडेही राज यांनी लक्ष वेधले. भाजपने निवडणुका जिंकण्यासाठी वाटेल ती आश्वासने दिली. लोकांची मने भडकवण्यासाठी खोट्याचे खरे करून दाखवले. विरोध करणाऱ्यांना ट्रोल करून शिवीगाळ केली. त्यांचे खच्चीकरण केले, असेही ते म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘…पंतप्रधान पाणीही विचारत नाही’, संजय राऊतांची नाराजी!

News Desk

तृतीयपंथीय सेजलकडे नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र सन्मानाने हस्तांतरीत

Aprna

भाजपच्या आमदारांनी देवस्थानच्या जमिनी लाटल्या; मलिकांचा गंभीर आरोप

Aprna
क्राइम

बेवड्या बापाने सहा वर्षीय मुलीला कटरने केले ठार

News Desk

बारामती- चोविस तास दारूच्या नशेत राहणा-या एका निर्दयी पित्याने आपल्या पोटच्या मुलीचा गळा घोटल्याची घटना पुण्यात जिल्ह्यात घडली. बेवड्या बापाने मुलीचा गळा कटने कापून खून केला. इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे ही घटना घडली. समीक्षा चारूदत्त शिंदे असे मुलीचे नाव आहे. खाऊ देतो म्हणून मुलीला घराबाहेर नेले. एका शेतात नेऊन त्याने मुलीचा गळा घोटला. दरम्यान, पोलिसांनी नराधम बापाला अटक केली आहे.

Related posts

२५ विद्यार्थ्यांची हजामत, शिक्षकांवर गुन्हा

News Desk

किरण गोसावीच्या कोठडीत 8 नोव्हेंबरपर्यंत वाढ

News Desk

एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष बेपत्ता प्रकरण, एक जण पोलिसांच्या ताब्यात

swarit