HW News Marathi
महाराष्ट्र

घोटाळ्यात चौकशीसाठी नेमलेल्या समितीचे पुढे काय होते !

पुणे | देशातील गाजलेल्या बोफोर्स, हर्षद मेहता बँक घोटाळा, टू जी स्पेक्ट्रम या मोठमोठ्या घोटाळ्यात चौकशीसाठी ज्या समित्यांची स्थापना केले जाते. त्या समितीचे पुढे काय होते, असा सवाल कधी कोणी का विचारत नाही, असे सवाल माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांनी केले आहे. गोडबोले यांना राष्ट्रीय प्रतिष्ठानतर्फे टिळक स्मारक मंदिरात आयोजित‘राष्ट्रीय चारित्र्य पुरस्कार वितरण’ कार्यक्रमात बोलत होते.

आजवर ज्या प्रकरणाकरिता संसदीय समित्या नेमण्यात आल्या त्या एकाही प्रकरणात यशस्वी झाल्या नाहीत. या संसदीय समित्यांचे भजे झाले आहे. नागरिकांना या समित्यांकडून खूप अपेक्षा असताना संसदीय समित्यांचे अपयश खेदजनक म्हणावे लागेल. राफेल कराराच्या चौकशीच्या मागणीबाबत ते म्हणाले की, आपण निवडून दिलेल्या सरकारवर आपला विश्वास नाही का?, असे देखील गोडबोले म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘आजपासून आठवी ते बारावीच्या शाळा सुरु’, काय आहे नियमावली?

News Desk

फडणवीसांनी भर पत्रकार परिषदेत लावला उपमुख्यमंत्र्यांचा तो व्हिडिओ

News Desk

बीड जिल्ह्यात पालकमंत्री मुंडेंकडून 24 तास सतर्क राहण्याच्या जिल्हा प्रशासनाला सूचना!

News Desk