HW News Marathi
महाराष्ट्र

निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यासाठी सविस्तर पंचनामे करण्याचे आदेश

मुंबई | निसर्ग चक्रीवादळाने काल (३ जून) थैमान घातला होता. मुंबईतही हे वादळ थैमान घालेल याचा विचार करत सर्व तयारी प्रशासनाने केली होती. मात्र सुदैवाने मुंबईत हे वादळ धडकले नाही. मात्र, महाराष्ट्रातील अनेक भागात निसर्ग चक्रीवादळाने हैदोस घालत मोठे नुकसान केले. या वादळामुळे झालेले नुकसान हे नैसर्गिक असून त्याची भरपाई देण्यासाठी पत्रक जारी करण्यात आले आहे.

या चक्रीवादळामुळे शेतीपिकाच्या झालेल्या नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्याचे व ३३% पेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासन निर्णयानुसार विहित केलेल्या दरानुसार मदत देण्यासाठी आवश्यक असलेला मदतीचा सविस्तर प्रस्ताव कृषी आयुक्तांमार्फत शासनास पाठवण्याचे, आदेश संबंधितांना दिल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

३ जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे राज्यातील विविध जिल्ह्यात जीवित व वित्त हानी झाल्याचे निदर्शनास आले आहे. हे चक्रीवादळ नैसर्गिक आपत्ती असून त्यामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यासाठी सविस्तर पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि त्यानुसार पंचनामे करून सर्व बाबी केल्या जातील अशी माहिती थोरात यांनी दिली

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सर्वाधिक नुकसानग्रस्त सणसर गावाला खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दिली भेट ;केली पाहणी

News Desk

उस्मानाबादच्या जिल्हा परिषदेत तानाजी सावंतांची भाजपला साथ

News Desk

काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना नेत्यांची राज्यपालांसोतबची भेट तुर्तास रद्द

News Desk