HW News Marathi
देश / विदेश

‘शिवसेना’ काढताना वंशंजांना विचारलं होतं का, ‘शिवसेना नको आता ठाकरे सेना करा’ उदयनराजेंचं सेनेला चॅलेंज….

पुणे | छत्रपती शिवाजी महाराज यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तुलना करणारे आज के शिवाजी-नरेंद्र मोदी हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर संपुर्ण महाराष्ट्राात गदारोळ झाला. या पुस्तकाचा निषेध करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज उदयनराजे भोसले यांनी पुणयात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी या पुस्तकाचा निषेध नोदवला परंतु त्यांनी शिवसेना,राष्ट्रवादीला लक्ष केले.

उदयनराजे म्हणाले, कोणीतरी काहीतरी लिखान करायचे, आम्ही त्यांना मानधन दिले नव्हते. त्याची लायकी त्याने ओळखावी. शिवसेना जेव्हा नाव दिलं तेव्हा वंशजांना विचारायला आला हाेता का. महाविकास आघाडीचं राजकारण चुलीत गेलं, मी आजपर्यंत समाजकारण केलं. महाशिवआघाडी मधून शिव का काढलं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. . साेयीप्रमाणे राजकारण करायचं ही यांची लायकी असा टोला लगावला. शिवाजी महाराजांचे नाव वडापावला देता,शिववडा .. . महाराजांचे वंशज असलाे तरी विचारांचा वारसा हा सर्व देशाला लाभला आहे. देशातील प्रत्येकजण शिवाजी महाराजांचे माेठे कुटुंब आहे. महाराजांनी कधी जातीभेद केला नाही.

मुंबईला शिवसेना भवन आहे. बाळासाहेबांच्या फाेटाे खाली शिवाजी महाराजांचा फाेटाे आहे. यावर शिवसेनेने उत्तर द्यावे. वंशज म्हणून आमच्यावर टीका केली जाते. शिवाजी महाराजांची शिकवण आम्ही पाळत आलाे. सत्तेच्या मागे आम्ही कधी गेलाे नाही. निवडून आल्यानंतर खासदारकीचा राजीनामा दिला. जे माझ्या बुद्धीला पटत नाही ते मी करत नाही. माझे नाते सर्वसामान्य लाेकांशी. त्यांच्याशी जीव द्यायलाही मी तयार. काेणीही आम्ही काय करायचे ते सांगू नये. हातात महाराजांच्या नावाचा दाेरा आहे. घड्याळ हातात आहे. त्या लाेकांना सांगायचे आहे तुमची वेळ संपली आहे. काेणीही काहीही बाेलावे आणि आम्ही

जाणते राजे ही उपमा काेणी दिली माहीत नाही. त्याचे उत्तर द्या.

शिवसेनेने जेम्स लेनच्या वेळी इतिहास संशाेधक म्हणत माफई मागितली. तेव्हा महाराजांच्या प्रतिची अस्मिता कुठे गेली. साेयीप्रमाणे महाराजांचे नाव घेतले जाते. महाराजांचे विचार आचरणात आणले असते तर आज ही परिस्थिती आली नसती हे सर्व पक्षांना सांगावेसे वाटते.

शिवसेना नाव काढून टाका आम्ही वंशज पाहू, ठाकरे सेना करून टाका . शिवसेना नाव काढल्यावर किती तरुण तुमच्या मागे उभा राहिल, आहो थोडी तरी लाज बाळगा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तीन वेळा करायची, आहो अजून किती महाराजांची मानहानी करणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कृषि कायद्याविरोधात शेतकऱ्यांची ६ फेब्रुवारीला भारत बंदची हाक!

News Desk

अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी नव्या घटनापीठाची स्थापना

News Desk

शांततेच्या मार्गाने चाललेल्या शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचे मोठे प्रयत्न, मात्र… !

News Desk