HW News Marathi
महाराष्ट्र

लोकांनी रस्त्यावर येऊन ढोल वाजवले होते, आता आग नाही लावली म्हणजे झाले !

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (३ एप्रिल) देशवासियांशी रविवारी (५ एप्रिल) रात्री ९ वाजता ९ मिनिटे दिवे लावण्याचे आवाहन केले आहे. मोदींच्या या आवाहनानाची विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत मोदींच्या दिवे लावण्याच्या आवाहनावर टीका केली आहे.

“टाळ्या वाजवायला सांगितल्या तेव्हा लोकांनी रस्त्यावर येऊन ढोल वाजवले होते आता आग नाही लावली म्हणजे झाले. साहेब कामाचे आणि लोकांच्या पोटा पाण्याचे बोला.” असे ट्वीट करत संजय राऊतांनी मोदींवर निशाणा साधला. राऊतांना पाठोपाठ महाराष्ट्र काँग्रेसने देखील मोदींच्या आवाहनावर ट्वीट करत टीका केली आहे.

महाराष्ट्र काँग्रेस ट्विटर हँडलवरमध्ये म्हणाले की, ““कोरोना विषाणूने थैमान घातलं असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवे लावा, टाळ्या वाजवा, असे इव्हेंट करुन परिस्थितीचं गांभीर्य घालवत आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केलेल्या सुचना भाजप सरकारने तात्काळ अंमलात आणून लोकांना दिलासा द्यावा.”

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुंबईतून हुसकवलेले फेरीवाले कल्याण डोंबिवलीत

News Desk

नवाब मलिकांचा नवा खुलासा, सांगितलं सॅम डिसूझाचं खरं नाव

News Desk

खडसे राष्ट्रवादीमध्ये येणार का? अजित दादा म्हणतात…

News Desk