HW News Marathi
देश / विदेश

“महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणारे आता कुठे जातात ?”,खासदार कोल्हेंचा सवाल

पुणे । उत्तर प्रदेशमधील हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील या प्रकरणावर भाष्य केले आहे. “महाराष्ट्रात जरा काही घडलं की राष्ट्रपती राजवटची मागणी करणारे आता उत्तर प्रदेशातील घटनांच्या वेळी कुठे जातात ?”, असा सवाल अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला आहे.

पीडित मुलीची भेट घेण्यासाठी गेलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धक्काबुक्की झाली. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी दिलेल्या वागणुकीवर अनेक स्तरांतून टीका होत आहे. याबाबत बोलताना अमोल कोल्हे म्हणतात की, “ही घटना लोकशाहीवर घाला घालणारी आहे. ही उत्तर प्रदेश सरकारची दडपशाही आहे. देशात लोकशाहीचा गळा घोटला जात आहे.”

“एखाद्या कुटुंबांत जेव्हा कोणती दुदैवी घटना घडते तेव्हा त्यानंतर त्या पीडित कुटुंबाला आधार देण्यासाठी समाज पुढे येऊ लागतो. मात्र, या घटनेनंतर उत्तर प्रदेश पोलिसांकडून पीडित मुलीच्या कुटुंबियांना भेटण्यापासून रोखण्यात आले. ही निंदनीय बाब आहे. विशेष म्हणजे प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीवर बोलणारे भाजपचे नेते यावेळी मात्र मूग गिळुन गप्प आहेत”, असे म्हणत अमोल कोल्हे यांनी भाजपवर निशाणा साधला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वा रे केजरीवाल…केजरीवाल सरकारची कन्हैया कुमारवर देशद्रोहाचा खटला चालवण्यास मंजुरी ..

Arati More

पोक्सो कायद्याअंतर्गत येणाऱ्या दोषींनी दयेचा अर्ज करता येऊ नये !

News Desk

#PulwamaAttack : दहशतवाद्यांनी आपले तळ पाकिस्तानी लष्कराच्या जवळ नेले

News Desk