HW News Marathi
महाराष्ट्र

कोण आहेत पडद्यामागचे सुत्रधार?, सत्य समोर यायला हवे! । आशिष शेलार

मुंबई । प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या सॉफ्टकांनी भरलेल्या गाडीप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि महाविकासआघाडीची पुरती कोंडी केल्यानंतर आता भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत काही सवाल उपस्थित केले आहेत. “एन्काऊंटर स्पेशल” अधिकाऱ्यांने टीआरपी प्रकरणाचा तपास करतानाही अशीच खंडणी वसूल केली होती का?, त्याही प्रकरणात मिडिया हाऊसकडून वसूली केली होती का?”, असे प्रश्न आशिष शेलार यांनी केले आहेत.
आशिष शेलार आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, “या “एन्काऊंटर स्पेशल” अधिकाऱ्यांने टीआरपी प्रकरणाचा तपास करतानाही अशीच खंडणी वसूल केली होती का?, त्याही प्रकरणात मिडिया हाऊसकडून वसूली केली होती का?, कुणाच्या जोरावर मिडिया हाऊसकडून वसूलीचे बळ आले? , कोण आहेत पडद्यामागचे सुत्रधार?, सत्य समोर यायला हवे!”, असे म्हणत आशिष शेलार यांनी या प्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

NIA कडून या प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना विशेष न्यायालयाने २५ मार्चपर्यंत म्हणजेच एकूण १० दिवसांसाठी NIA कोठडी सुनावली आहे. त्याचप्रमाणे, सचिन वाझेंवर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून भाजपने महाविकासआघाडी सरकारला चांगलेच कोंडीत पकडले आहे. याच पार्श्वभूमीवर, आशिष शेलार यांनी आता हे ट्विट केले आहे.
मनसुख हिरेन यांच्या मृत्यूवरून राज्यातील राजकारण पेटले आहे. हिरेन यांचा मृतदेह मुंब्रातील रेतीबंदर येथे सापडला. दरम्यान, हिरेन यांच्या या संशयास्पद मृत्यूमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. याच पार्श्वभूमीवर, “ठाणे पोलिसांचा किंवा एटीएसचा भाग नसलेले वाझे हिरेन यांच्या पॉर्टमार्टमच्या ठिकाणी काय करत होते”, असा सवाल भाजपाकडून केला जात आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘पोलीस कार्यालयात ५०% हजेरी, इतरांना Work From Home’, पोलीस महासंचालकांचे आदेश

News Desk

सरकारचे अस्तित्व कुठेच दिसत नाही – देवेंद्र फडणवीस

News Desk

महाविकास आघाडी सरकारने १५ मोठ्या कंपन्यांसोबत केलेल्या कराराने औद्योगिक क्षेत्राला भरारी मिळणार – महेश तपासे

News Desk