HW News Marathi
महाराष्ट्र

हिवाळी अधिवेशनात कोण असणार अजित पवारांच्या हिटलिस्टवर 

मुंबई – पावसाळी अधिवेशनात सरकारला सळोकेपळो करून सोडणाऱ्या राष्ट्रवादीनं आता हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी अजित पवारांनी खास रणनिती आखून सरकारची कोंडी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. राज्यात वाढत चाललेलं भारनियमन, यवतमाळ मध्ये किटकनाशक फवारणी करताना शेतकऱ्यांचा झालेला मृत्यू, जाहीर करूनही न मिळालेली कर्जमाफी, चूकीच्या पद्धतीनं लादला गेलेला जीएसटी, वाढत चाललेली महागाई या मुद्द्यांच्या आधारे सरकारला धारेवर धरलं जाणार आहे. त्यासाठी वातावरण निर्मिती व्हावी म्हणून अजितदादा स्वता राज्यव्यापी दौराही करणार आहेत.

निवडणुकीच्या आधी भाजपने दिलेली आश्वासने आणि मागच्या साडे तीन वर्षांतील वाटचाल पाहिली तर लक्षात येते की भाजपला कमालीचे अपयश आल्याची प्रतिक्रीया अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. सध्याचे भारनियमन ही कृत्रिम विजेची टंचाई असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. उर्जा मंत्री असताना एप्रिल, मे मधेच कोळसा उपलब्ध करून दिला जात होता. मात्र या सरकारने अजूनही कोळसा उपलब्ध करून दिलेला नाही. विद्यमान उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे हे अपयश आहे. सध्याच्या स्थितीत तब्बल दोन हजार मेगावॅटचा शॉर्टफॉल असल्याची माहिती काही अधिकाऱ्यांनी दिल्याचेही पवार यांनी स्पष्ट केलं. इतका मोठा शॉर्टफॉल असेल तर जनता अंधारात जाईल. कोळसा पुरविणे महानिर्मितीचे काम आहे. इतकं होत असताना मुख्यमंत्री काय करत होते, असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला.

यवतमाळमध्ये किटक नाशक फवारणी करताना ज्या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला त्याला जबाबदार असणाऱ्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा यासाठी पक्षाचा आग्रह असेल. सध्या भितीने अनेक शेतकरी हेल्मेट घालून फवारणी करत आहेत. ऑक्टोबर हीट असल्याने अशा पद्धतीने फवारणी केली तर उन्हानेच हे शेतकरी मरतील याकडे सरकारने गांभिर्याने लक्ष द्यावे असेही ते म्हणाले.

शेतकऱ्यांची कर्जमाफीचा मुद्दाही उचलून धरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. सरकारने कर्जमाफीची घोषणाच केली मात्र प्रत्यक्षात कर्जमाफी दिली नाही. सरकार फक्त आकड्यांचा खेळ करून शेतकऱ्यांना लाईनमध्ये उभे करत आहे. दिवाळी आधी कर्जमाफी देणार असे सरकारने सांगितले होते पण प्रत्यक्षात ती कर्जमाफी मिळणा नाही हे स्पष्ट आहे. याचाही जाब अधिवेशनात विचारू असे पवार यांनी स्पष्ट केले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आर्थिक निकषावरील आरक्षण न्यायालयात टिकणे अशक्य!

News Desk

ऊसतोड कामगारांच्या मुलांबाबतच्या पोस्टला पंकजा मुंडेंचं उत्तर…..!

News Desk

वाईट नेता मिळणे हा महाराष्ट्राचा दोष नाही !

News Desk