HW News Marathi
महाराष्ट्र

“कशाला आशीर्वाद?, जनतेचा जीव धोक्यात घालायला” मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची टीका!

मुंबई। भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेनिमित्ताने केंद्रीय मंत्री नारायण राणे हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यानंतर नारायण राणे यांना झालेल्या अटक व सुटकेची गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा झाली. या प्रकरणाला आज एक आठवडा पूर्ण झाला असला तरी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील शाब्दीक चकमक काही संपत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मिशन ऑक्सिजन अंतर्गत ठाणे शहरासाठी कायम्वरूपी ऑक्सिजन प्लांटचा ऑनलाईन लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जन आशीर्वाद यात्रेवर टीका केली.

उद्धव ठाकरेंची जन आशीर्वाद यात्रेवर टीका

जनता जगली काय?, त्यांचे प्राण गेले काय? आम्हाला १०० टक्के राजकारण करायचं आहे. समोर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका व्यक्त केला जात असताना सुद्धा आम्हाला यात्रा काढायच्या आहेत. आम्हाला नवी सोई सुविधा जनतेसाठी करायच्या नाहीत. पण त्यांचे जीव कदाचित धोक्यात येऊ शकतील, असे सभा समारंभ करायचे आहेत. का तर, आम्हाला जनतेचे आशीर्वाद पाहीजे आहेत. कशाला आशीर्वाद?, जनतेचे जीव धोक्यात घालायला. या सर्व घाणरड्या राजकारणापासून बाजूला राहून आपण सगळेजण जनतेच्या हिताची कामं करत आहोत. तुमचं कौतुक करतो.”, अशी टीका जन आशीर्वाद यात्रेवर केली.

दहीहंडी आणि गणेशोत्सव काळात गर्दी टाळावी

दहीहंडीचा उत्साह आणि उत्सव याला काही काळासाठी आपण मुकलो आहोत याची मला जाणीव आहे. तो थरार, ते उधाण मला अजूनही आठवते. पण आज गर्दी करून उत्सव साजरी करण्यासारखी परिस्थिती नाही. करोनाचे संकट जगभर पसरले आहे .करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, केंद्र सरकारनेही हेच सांगितले आहे. त्यांनी दहीहंडी आणि गणेशोत्सव काळात गर्दी टाळावी असे राज्याला पत्र पाठवून कळवले आहे. जे आंदोलन करू इच्छितात त्यांना केंद्र सरकारचे हे पत्र आपल्याला दाखवायचे आहे..”, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात काँग्रेसला क्रमांक एकचा पक्ष बनवून पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देऊ – नाना पटोले

News Desk

ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे निधन

News Desk

नवरात्रोत्सवानिमित्ताने “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियान राबवण्याची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Aprna