HW News Marathi
महाराष्ट्र

माझा पक्ष रजिस्टर असूनही आम्ही भाजपच्या चिन्हावर का लढायचे ?

मुंबई | “माझा पक्ष रजिस्टर असूनही भाजपच्या चिन्हावर का लढायचे ?”, असा सवाल आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. सध्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेनेत युती आणि जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यासाठी चर्चा सुरु आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीए सरकारचा ऐतिहासिक विजय मिळाला. या यशात भाजपला मित्रपक्षांची खंबीर साथ लाभली. त्यामुळे, येत्या विधानसभेला मित्रपक्षांनी भाजपच्या चिन्हावर लढावे, अशी मागणी भाजपकडून असल्याची चर्चा आहे. मात्र, रामदास आठवले यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे.

रामदास आठवले यांनी यापूर्वी देखील या मुद्द्यावर भाष्य केले होते. “आम्ही जर भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढलो तर आमचे स्वतंत्र अस्तित्व उरणार नाही”, असे रामदास आठवले यांनी काहीच दिवसांपूर्वी म्हटले होते. केवळ रामदास आठवलेच नव्हे तर अन्य मित्रपक्षांनी देखील भाजपची ही मागणी नाकारली होती. “आमच्या पक्षाची ओळख वेगळी ठेवायची असेल तर आमच्याच चिन्हावर लढले पाहिजे, असे आमच्या कार्यकर्त्यांचे मत आहे. माझा पक्ष रजिस्टर असूनही आम्ही भाजपच्या चिन्हावर का लढायच ?”, असा सवाल रामदास आठवले यांनी आता पुन्हा उपस्थित केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“राजू शेट्टींनी टोकाची भूमिका घ्यायची गरज नव्हती” – जयंत पाटील

News Desk

“उडता पंजाब’ नंतर ‘उडता महाराष्ट्र’ करण्याचा कट होता” – नवाब मलिक

News Desk

शेतकऱ्यांना संघर्षाशिवाय काही मिळणार नाही | सुधीर सावंत

swarit