HW News Marathi
देश / विदेश

लवकरच महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नव्या नेत्याची वर्णी लागणार ?

मुंबई | महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी आता नव्या नेत्याची वर्णी लागणार असल्याच्या जोरदार चर्चा सध्या सुरु आहेत. बिहार विधानसभा निवडणुकांनंतर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बदलणार असून विद्यमान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या जागी आता काँग्रेसचे नेते आणि राज्याचे पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांची नियुक्ती केली जाणार असल्याच्या चर्चा आहेत. इतकंच नव्हे तर येत्या नव्या वर्षात राहुल गांधी देखील काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सुनील केदार यांची वर्णी लागणार असल्याच्या चर्चांसोबतच काँग्रेसचे मोठे नेते विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले यांच्याही नावांची चर्चा सुरु आहे. दरम्यान, येत्या काळात पक्षाकडून नेमका काय निर्णय घेतला जातो हे पाहणे महत्त्वाचे आहे. सुनील केदार हे काँग्रेसचे दिग्गज नेते असून ते नागपुरातील सावनेर मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि वर्ध्याच्या पालकमंत्रीही आहेत. सध्या त्यांच्याकडे राज्याच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकाससह क्रीडाआणि युवक कल्याण मंत्रालयाच्या कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकशाही धोक्यात असेल तर विशेष अधिवेशन बोलवा : यशवंत सिन्हा

News Desk

साखर निर्यातीसाठी कोटा पद्धतीऐवजी खुले धोरणच सुरु ठेवावे; मुख्यमंत्र्यांची पत्राद्वारे प्रधानमंत्र्यांना विनंती

Aprna

सुस्पष्ट परराष्ट्र धोरणामुळे भारताची खंबीरता जगात पोहोचली! – उपमुख्यमंत्री

Aprna