HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईत गेल्या पाच वर्षांपासून महिला अपहरणात वाढ | मुख्यमंत्री

मुंबई | गेल्या पाच वर्षात मुंबईत मुली हरविणे आणि अपहरणाच्या प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत ही धक्कादायक आकडेवारी मांडली. यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मुंबईत २०१३ मध्ये १८ वर्षाखाली वयोगटातील हरवलेल्या किंवा अपहरण झालेल्या मुलींची संख्या ९२ होती. तर २०१४ मध्ये १५०० झाली तर २०१७ साली १३६८ होती. २०१३ ते २०१७ मध्ये या काळावधीत १८ वर्षाखालील वयोगटातील एकूण ५०५६ मुलींचे अपहरण आणि हरविलेल्या घटनांची आकडेवारी आहे. त्यापैकी ४७५८ मुली सापडल्या असून ३७० मुली बेपत्ता आहेत.

तसेच २०१३ ते २०१७ या कालावधीत १८ वर्षाखालील वयोगटातील मुला-मुलींचे अपहरण करून त्यांना भीक मागायला लावण्याबाबत तीन जणांवर गुन्हा दाखल केला होता. परंतु त्यापैकी फक्त २ जणांवर गुन्ह्यात दोषी सिद्ध झाले आहेत. तर एक आरोपी दोषमुक्त करण्यात आले. या कालावधीत मुलींचा अनैतिक कृत्यासाठी वापर केल्याचे एकूण ११ गुन्हे दाखल करण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात ४३ लाख ५९ हजार ७९८ क्विंटल अन्नधान्याचे वाटप, छगन भुजबळ यांची माहिती

News Desk

देवेंद्र फडणवीस आणि राज्यपालांचं ठरलं आहे की १२ नावं बाजूला काढून ठेवायची, हसन मुश्रीफ यांचा गौप्यस्फोट

News Desk

परळीत मुंडे बहीण भाऊ एकच!; काँग्रेसच्या शहर अध्यक्षांचा गंभीर आरोप

News Desk