HW News Marathi
महाराष्ट्र

सध्या विरोधक हे गलितगात्र झाल्याचे चित्र आहे !

पुणे | “सध्या विरोधक हे गलितगात्र झाल्याचे चित्र आहे. विधानसभेसाठी जरी ते एकत्र आले तरी काही होणार नाही”, अशी टीका केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. त्याचप्रमाणे, यावेळी रामदास आठवले यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. “सध्या राज ठाकरेंना काहीही उद्योग नाही. कोणतेही काम राहिलेले नाही. म्हणून ते ईव्हीएमच्या मागे लागले आहेत”, अशी बोचरी टीका देखील रामदास आठवले यांनी केली आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत रामदास आठवले बोलत होते.

“राज ठाकरे यांनी ममता बॅनर्जींची भेट घेण्यापेक्षा पक्ष वाढवण्याचे काम करावे”, असेही रामदास आठवले यावेळी म्हणाले. “घड्याळ काही चालत नाही व हात काही हलत नाही. त्यामुळे सध्या विरोधक गलितगात्र झाले आहेत”, असे रामदास आठवले यावेळी म्हणाले. “पंतप्रधान मोदी हे जाती-धर्मापलीकडे राजकारण करतात. त्यामुळे २०२४ पर्यंत तरी महायुतीच्या सरकारला कोणतीही चिंता नाही”, असा विश्वास देखील रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात आता फरकच उरलेला नाही नितेश राणे यांची टीका!

News Desk

रेल्वेचे आरक्षणासाठी पोस्टपेड पर्याय

News Desk

“नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळविण्यासाठी 2 हजार कोटी रुपयांचा सौदा”, संजय राऊतांचा गंभीर आरोप

Aprna