HW News Marathi
महाराष्ट्र

यवतमाळमध्ये ११ शेतक-यांचा मृत्यू, काहींना अंधत्व

यवतमाळ-कपाशी आणि सोयाबीन पिकांवरील बोंड आणि उंट अळीच्या संकटाचा सामना करण्यासाठी विविध प्रकारच्या कीटकनाशकांची शेतात फवारणी करताना विषबाधा होऊन जिल्ह्यातील ११ शेतक-यांचा बळी गेला आहे. काहींना अंधत्व आले आहे. या सर्व घटनांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली असून शेतक-यांच्या मदतीसाठी व उपाययोजना करण्याच्या संदर्भात एका आढावा बठक आयोजित केली आहे, असे वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत हे प्रकरण चांगलेच गाजले. फवारणीने विषबाधा होऊन तीन शेतकºयांची दृष्टी गेली तर सात शेतकºयांवर डोळ्याच्या डॉक्टरांकडे उपचार घेण्याची वेळ आली. जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे, उपाध्यक्ष श्याम जयस्वाल आणि विषय समित्यांच्या सभापतींच्या उपस्थितीत झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्य गजानन बेजंकीवार यांनी हा प्रश्न उपस्थित केला. ज्या कीटकनाशकाने शेतकºयांना विषबाधा होत आहे. त्या कंपन्यांवर बंदी घालावी, अशी मागणीही त्यांनी केली. मंगला पावडे यांनी संबंधित शेतकºयांच्या कुटुंबीयांना आद्गथक मदत करण्याची मागणी केली. विषबाधा टाळण्यासाठी जनजागृती करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. उमरी येथील शेतकरी विष्णू राठोड यांच्या दोन्ही डोळ्यांना इजा झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…असंच राहीलं तर आम्ही दरवर्षी तुम्हाला भेटत राहणार,” मु्ख्यमंत्र्याचं कोल्हापुरातील गावकऱ्यांना आवाहन

News Desk

“उद्धव ठाकरेंनी सत्तेत घेतलं म्हणून काँग्रेसची लोकं जीवंत झाली”

News Desk

‘मैं जब भी बिखरा हूँ दुगनी रफ्तार से निखरा हूँ’ राऊतांचे सुचक ट्विट

News Desk