HW News Marathi
महाराष्ट्र

काल मुख्यमंत्री दानवेंना म्हणाले, आमचे भावी सहकारी, आज जयंत पाटील-देवेंद्र फडणवीस एकाच गाडीत!

नंदुरबार। उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये युतीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर त्याचा पुढचा अंक नंदुरबारमध्ये पाहायला मिळणार का याची उत्सुकता आहे. कारण आज सत्ताधारी तिन्ही पक्षातील दिग्गज नेते आणि विरोधी भाजपतील नेते एकाच मंचावर आहेत. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि सहकार महर्षी पी.के आण्णा पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आज संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री के सी पाडवी, माजी मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल उपस्थित आहेत. महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि मंत्री जयंत पाटील हे या कार्यक्रमासाठी एकाच गाडीतून आले.

खानदेशातील सर्वच राजकीय नेते उपस्थितीत

दरम्यान या पुतळ्याचे अनावरण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, यांच्यासह खानदेशातील सर्वच राजकीय नेते उपस्थितीत राहणार आहेत.स्व.पी. के. अण्णा पाटील यांनी शहादा तालुक्यात दूध संघ, साखर कारखाना, सूतगिरणी, तसेच उच्च शिक्षणासाठी कॉलेज स्थापन करून या भागाचा संपूर्ण कायापालट केला होता.कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी पेपर प्लँट आणि आदिवासी बांधवांना सोबत घेऊन स्टार्च फॅक्टरी काढली होती. त्या माध्यमातून हजारो बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली होती. म्हणूनच त्यांना सहकारमहर्षी म्हणून खान्देशात ओळखले जाते.

आमच्या स्टेशनवर येऊ शकता

इतकंच नाही तर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा भाजपच्या गोटात आनंद होईल असं वक्तव्य केलं. कारण रावसाहेब दानवे यांनी नागपूर-मुंबई बुलेट ट्रेनसाठी पाठिशी राहण्याची विनंती केली. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, माझ्या राज्याच्या राजधानी आणि उपराजधानी जोडणारा लोहमार्ग मुंबई नागपूर बुलेट ट्रेन होणार असेल तर रावसाहेब मी तुम्हाला शब्द देतो, मी तुमच्यासोबत आहे.इतकंच नाही तर मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “मला रेल्वे का आवडते कारण रेल्वेला रूळ असतात, रूळ सोडून इंजिन कुठेही जात नाही. रुळ सोडून इकडे तिकडे कुठेही जाऊ शकत नाही. त्याला डायव्हर्जन मारलं तर आमच्या स्टेशनवर येऊ शकता”

रावसाहेब दानवे काय म्हणाले?

दरम्यान, या कार्यक्रमात रावसाहेब दानवे यांनीही तुफान फटकेबाजी केली. आज 17 तारखेला आमचा स्वातंत्र्याचा दिवस उजाडला, स्वातंत्र्याच्या 1 वर्षांनी देशात विलीन होता आलं. 17 सप्टेंबर हा आम्ही स्वातंत्र्याचा दिवस साजरा करतो. ग्रामीण विकासाचा पाया म्हणजे जिल्हा परिषद आहे. मी या जिल्हा परिषदेचा सदस्य होतो. त्यावेळी भाजप नव्हता जनता पक्ष होता, आणि नांगराच्या चिन्हावर मी निवडून आलो होतो. तेव्हा वाटायचं एक बिल्डिंग असावी ती आज पूर्ण झाली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पेट्रोल पंप तपासणी मोहीम सुरु

News Desk

कांजूरमार्गमधील ‘त्या’ कोरोना बाधिताने बाहेरगावी प्रवास केला नव्हता

News Desk

कुणीच कुणाला पाडत नसते, महाजनांकडून खडसेंच्या आरोपाचे खंडन

News Desk