HW News Marathi
महाराष्ट्र

सरकार केव्हा पडेल कळणारही नाही; देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर!

नागपूर। काल दसरा मेळाव्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, असे वक्तव्य केले होते. त्याला विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. जे लोक म्हणतात, हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, पण जेव्हा हे सरकार पडायचे असेल, तेव्हा कळणारही नाही. मात्र, आम्हाल त्यात स्वारस्य नसून आमच्यासाठी जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले. तसेच सरकार पाडून दाखवा म्हटल्यापेक्षा सरकार चालवून दाखवा, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

ऐकेकाळी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात विचारांचे सोने लुटले जायचे. मात्र, कालच्या मेळाव्यात केवळ गरळ ओकताना आम्ही बघितले आहे. सत्तेत असल्याने त्यांना विस्मरण झाले की जनतेने भाजपाला नाही तर काँग्रेस राष्ट्रवादीला नाकारले आहे. मुळात शिवसेना ही 25 टक्के जागा जिंकत, बेईमानी करून सत्तेत आलेला पक्ष आहे, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. मुख्यमंत्री बनण्याची उद्धव ठाकरे यांची महत्वाकांक्षा होती. खरं तर महत्त्वकांशा असणे चुकीचे नाही, पण लपवून तत्वज्ञान सांगणे हे नक्कीच चुकीचे आहेत, असेही ते म्हणाले. आता आम्हाला दोष देणे थांबवा, तेच-ते सांगून किती वर्ष काढणार आहात, असा प्रश्नही त्यांनी शिवसेनेला विचारला आहे. मुख्यमंत्र्यांनी काल महाराष्ट्राचा बंगाल करायचा आहे, असे वक्तव्य केले होते. त्यावरही देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. बंगालमध्ये एकही उद्योग टीकला नाही. तेथे तुमच्या विरोधात बोलणाऱयांचे हातपाय छाटले जातात, असा महाराष्ट्र तुम्हाला घडवायचा आहे का, आम्ही तुमचे हे मनसुबे कधीही पूर्ण होऊ देणार नाही, महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही, असेही ते म्हणाले.

सरकार पाडून दाखवा म्हणतात, ज्या दिवशी पडेल त्यादिवशी कळणार पण नाही

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे अनेक मंत्री आणि नेते यांच्या घरावर केंद्रीय तपास यंत्रणांचे छाप पडत आहेत. यावर काल मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले होते. राज्यात तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यालाही देवेंद्र फडणवीसांनी प्रत्त्युत्तर दिले आहे. तपास यंत्रणांचा गैरवापर मोदी करत नाही, असे केले असते. तर तुमचे अर्धे मंत्रिमंडळ जेलमध्ये असते, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. एकूणच मेळाव्यात ना सोने होते, ना विचार, मुख्यमंत्री यांच्या बोलण्यातून केवळ नैराश्य दिसत होते. भाजपाला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला, तरी आम्ही करू देणार नाही, आम्ही पक्ष म्हणून उभे राहू, सरकार पाडून दाखवा म्हणतात, ज्या दिवशी पडेल त्यादिवशी कळणार पण नाही, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

‘…मग शिवसैनिकाला मुख्यमंत्री का केलं नाहीत?’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दसरा मेळाव्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदावरून डिवचलं होतं. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तर मग सुभाष देसाई, एकनाथ शिंदे आणि दिवाकर रावते यांना मुख्यमंत्री का नाही केलं? असा सवाल करतानाच तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तर नारायण राणे आणि राज ठाकरे शिवसेना सोडून का गेली असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्लॅस्टर ऑफ पॅरिसवरील केंद्र सरकारने बंदी उठवावी, मुर्तीकारांची राज ठाकरेंकडे मागणी 

News Desk

PandharpurElection : सातव्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे यांची १ हजार मतांची आघाडी

News Desk

नागपूरवाले मला मध्येच म्यूट का करतायत? मुख्यमंत्र्यांचा मिश्किल सवाल

News Desk