HW News Marathi
महाराष्ट्र

कोल्हापूर – सांगलीवर पुन्हा एकदा महापुराचे संकट घोंघावत आहे…!

कोल्हापूर | गेले काही दिवस महाराष्ट्रात अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावलेली दिसत आहे. काही ठिकाणी पुरेसा पाऊस पडला तर काही ठिकाणी पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, कोल्हापूर, सांगलीतील चांदोली आणि साताऱ्याच्या कोयना धरणातून मोठ्या प्रमाणत पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पूर परिस्थिती येऊ शकते असे म्हटले जात आहे. गेल्या वर्षी कोल्हापूर, सांगलीमध्ये पुराने हाहाकार घातला होता. तीच स्थिती यंदा देखील येण्याची चिन्हे दिसत आहेत.

पश्चिम महाराष्ट्रात अनेक दिवस मुसळधार पावसामुळे नद्या आणि धरणे तुडूंब भरले आहेत. पाण्याची पातळी वाढल्यामुळे धरणांतून विसर्ग सुरू झाला आहे. कोल्हापूर, चांदोली आणि कोयना या ३ धरणांमधून ४५ हजार क्युसेक विसर्ग होणार असल्याने कोल्हापूर, सांगलीत पूर येऊ शकतो अशी शक्यता आहे.कोयना धरण परिसरात पावसाचा जोर कायम आहे. कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…दुष्मन जरी असला तरी तो त्या जागी”, फडणवीस-राऊतांच्या गळाभेटीवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

News Desk

खडसेंवर अन्याय होणार नाही, तिसऱ्या यादीत त्यांचे समाधान होणार !

News Desk

खासदार नवनीत राणांनीं घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट!

News Desk