HW News Marathi
महाराष्ट्र

गटारीपूर्वीच बोकडांवर अत्यंसंस्कार

अहमनगर: गटारी जवळ आल्याने बोकडं फस्त करण्याची खवय्याची चढाओढ सुरू असताना नगर जिल्ह्यात मात्र बोकडांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. एरवी देवाला सोडलेले बोकड विकले अथवा कापले जातात. मात्र संगमनेर तालुक्यातील करूले येथे गहिनीनाथ महाराज देवाला सोडलेल्या बोकडाचा अकाली मृत्यू झाल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी शुक्रवारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करीत प्राणीमात्राविषयी असलेले प्रेम व्यक्त केले.

संगमनेर तालुक्यातील करुले गावातील ज्ञानदेव आहेर यांनी ग्रामदैवत गहिनीनाथ महाराजांच्या यात्रेच्या दिवशी चार वषार्चा असताना बोकड देवाला सोडला होता, मात्र विषबाधा झाल्याने बोकड बेशुद्ध पडला. त्याच्या तोंडातून अचानक फेस येत असल्याचे गावातील सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब आहेर यांनी पाहिले. त्यानंतर त्यांचे बंधू सोमनाथ आहेर यांनी तात्काळ पशुवैद्यकीय केंद्राचे डॉ. थोरात यांना बोलविले. मात्र डॉक्टर येईपर्यंत बोकडाची प्राणज्योत मालवली होती. त्यानंतर अण्णासाहेब आहेर, सोमनाथ आहेर, कादरभाई पठाण, किशोर बर्डे व गणेश मोरे या तरुणांनी एकत्र येत बोकडाचा दफनविधी केला. ग्रामदैवत गहिनीनाथ महाराजांच्या मंदिराजवळ खडडा खोदून अंत्यविधी करून प्राणीमात्राविषयी असलेले प्रेम व्यक्त केले. या बोकडाचा ग्रामस्थांना चांगलाच लळा लागला होता. आता त्याच्या मृत्यूने ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भाजपच्या पोपटाला पिंजऱ्यात टाकलं, अनिल परब यांचा विरोधकांना पलटवार

News Desk

गावात कृषी अधिकारी, सहाय्यक येतात का? कृषिमंत्र्यांचे शेतकऱ्यांची केली विचारपूस

News Desk

नागपुरातही १ कोरोना रुग्ण पॉझिटीव्ह

swarit
देश / विदेश

देशाची वाटचाल गुलामगिरीकडे- राहुल गांधी

News Desk

वृत्तसंस्थाः सध्या एकापाठोपाठ एक करून देशातील लोकशाही संस्थांवर पद्धतशीरपणे ताबा मिळवला जात आहे. यामध्ये पंतप्रधान, सरकारी अधिकारी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहभाग आहे. हे सर्व मिळून देशाला गुलामगिरीकडे ढकलत असल्याची जहरी टीका कॉँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी बेंगळुरू येथे केली. कर्नाटक सरकारकडून बंगळुरू येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘क्वेस्ट फॉर इक्विटी’ या कार्यक्रमात राहुल गांधी बोलत होते. आपल्या राजा नागडा आहे, परंतु ते मान्य करण्याची कोणा अंध भक्ताची तयारी नाही, कारण भक्त त्याच्या प्रेमात आकंठ बुडले आहेत, असे म्हणत त्यांनी मोदी यांच्यावर जहरी टीका केली हे.

सध्या देशात खरं बोलणाऱ्यांता गळा दाबला जात असून गरीब व दुर्बल घटकांना नामोहरम केले जात आहे. भाजप हे बेगडी सरकार आहे. हुकुमशाहीकडे देशाला नेण्याची भाजप व संघाची चाल असून त्यानुसार सर्व खटाटोप सुरू असल्याचेही राहुल यांनी या वेळी म्हटले आहे.

Related posts

तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करू नका, इथे तडजोड नाहीत !

News Desk

मोदींमुळे देशात आर्थिक संकटाचे सावट

News Desk

जैविक इंधनावर भारताचे पहिले विमान उड्डाण यशस्वी

Gauri Tilekar