HW News Marathi
महाराष्ट्र

नोकरीसाठी जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक

नवी दिल्ली- सरकारी नोकरीसाठी खोटे जात प्रमाणपत्र सादर करणे यापुढे महागात पडणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी महाराष्ट्र सरकारच्या अपील याचिकेवर सुनावणी करताना हा निकाल दिला. यापुढे शिक्षण आणि सरकारी नोकरीमध्ये जात प्रमाणपत्र खोटे आढळून आल्यास केवळ नोकरीच नव्हे, तर झालेली पदवी आणि प्रवेशदेखील रद्द केले जाणार आहे, शिवाय खोटे प्रमाणपत्र सादर करणाºयांवर गुन्हा दाखळ केला जाणार आहे.

सरन्यायाधीश जे. एस. खेहर आणि डी. वाय. चंद्रचूड यांनी हा महत्वपूर्ण निकाल दिला आहे. यापूर्वीचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय रद्दबातल ठरवला आहे. नुकतेच सरकारनेबनावट जात प्रमाणपत्रांबाबत संसदेत एक अहवाल सादर केला असून त्यानुसार, बनावट जात प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवणाºयांची संख्या १८०० वर गेल्याचे स्पष्ट झाले होते. यापैकी बहुतांश लोक सरकारी बँका आणि विमा कंपन्यांमध्ये नोकरीला आहेत. डिपार्टमेंट आॅफ पर्सनल अ‍ॅण्ड टेक्नोलॉजीचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी २९ मार्च रोजी लोकसभेत एका प्रश्नाचे उत्तर देताना १८३२ लोकांनी खोट्या जात प्रमाणपत्रांवर नोकरी मिळवली आहे. त्यापैकी २७६ जणांना निलंबित करण्यात आले आहे. ५२१ जणांवर खटला सुरू आहे आणि १०३५ जणांच्या विरुद्ध अद्याप कारवाई होणे बाकी आहे.

– १८३२ जणांपैकी १५७ जण एसबीआय, १३५ जण सेंट्रल बँक आॅफ इंडिया, ११२ जण इंडियन ओव्हरसीज बँक, १०३ जणांनी सिंडिकेट बँक आणि ४१ जणांनी विविक सरकारी कार्यालयात नोकºया मिळविल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सरकार तर्फे गिरीश महाजन यांची रात्री शेतकरी मोर्चाला भेट

News Desk

“आता कुणाच्या कुबड्या नाही घेणार, २०२४ मध्ये स्वबळावर लढणार”

News Desk

फडणवीसांना २ तास दिले असते तर प्रश्न सुटले असते – चंद्रकांत पाटील

News Desk
देश / विदेश

पारंपरिक पौरहित्याला फाटा देत पुतळ्याला फेरे मारून केले लग्न

News Desk

भोपाळ- पारंपरिक विवाहपद्धतीला फाटा देत मध्य प्रदेशातील सिहोरमधील तरुण-तरुणीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याभोवती फेरे घेऊन सत्यसोधन पद्धतीने लग्न केले. या लग्नाचे सर्वत्र कौतुक होत असून सोशल मीडियावर त्याची मोठी चर्चा आहे. पौराहित्य पद्धत हद्दपार करण्यासाठी नव्या पिढीने टाकलेले हे महत्वपूर्ण पाऊलं मानलं जात आहे.

मध्य प्रदेशमधील कल्लू जाटव आणि वैजंती राजोरिया यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याला

सात फे-या मारून लग्न केले. काही सामाजिक संघटना आणि पुरोगामी नागरिकांच्या मतदीने हे कार्य पार पडले. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने या जोडप्याने हे लग्न केल्याचे सांगितले जात असले तरी त्यांनी उचलले पाऊलं क्रांतीकारक असेच म्हणावे लागेल. अशा प्रकारच्या कार्यामुळे यापुढे पारंपरिक प्रचलित पौराहित्याची पद्धत हद्दपार होण्यास मदत होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Related posts

दिल्लीच्या औरंगजेब रोडवर स्फोट,बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल

News Desk

चिनी सैन्यांची लडाखमध्ये घुसखोरी झाली नाही | भारतीय सैन्य

News Desk

बाप्पा झाले ‘जीएसटी’ मुक्त

News Desk