HW News Marathi
मुंबई

तरुणीचा विनयभंग करून केली धक्काबुक्की -रिक्षाचालक ताब्यात

ठाणे कामावरून घरी निघालेल्या तरुणी अलोक हॉटेल्स जवळ रस्ता ओलांडताना मस्तवाल रिक्षाचालकाने तरुणीला डोळा मारला व तरुणीच्या आईच्या पायावर रिक्षा नेल्याचा जाब विचारणाऱ्या तरुणीला धक्काबुकी करीत विनयभंग केल्याचा प्रकार बुधवारी रात्री स्टेशन परिसरात घडला. या प्रकरणी तरुणीने ठाणे नगर पोलीस ठाण्यात विनयभंग आणि धक्काबुक्की प्रकरणी गुन्हा दाखल केला. ठाणे नगर पोलिसांनी रिक्षाचालक सिकंदर शेख याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करीत अटक केली.

फिर्यादी तरुणी कामावरून घरी निघाली होती.तिच्या सोबत तिची आई होती. स्टेशन परिसरातून जात असताना रस्ता ओलांडत असताना रिक्षा चालक सिकंदर शेख(२७) रा. राबोडी, याने मुलीला डोळा मारला व रिक्षा मुलीच्या आईच्या पायावर नेली . या जाब रिक्षाचालकाला विचारला असता वाद झाला. रिक्षा चालक शेख याने तरुणीला काहीतरी अपशब्द वापरले व रिक्षाचालकाने तरुणीला धक्काबुक्की करून विनयभंग केला. तरुणीने व तिच्या आईने रिक्षाचालकाला चोप देऊन गस्तीवरील बीट मार्शल यांच्याकडे तक्रार केली. गस्तीवरच्या बिट मार्शल यांनी तरुणीच्या तक्रारीवरून आरोपी शेख याला ताब्यात घेतले. पोलिसांनी शेख याला ठाणे नगर पोलीस ठाण्यात विनयभंग आणि धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून तरुणीचा जाबजबाब नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत नोंदविला . ठाण्यात महिन्याभरात तरुणीचा विनयभंग, रिक्षातून फेकण्याचा घटना घडल्याने रिक्षाचालकांचा मस्तवालपणा वाढत चालला असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुंबई, उपनगर, वसईसह पालघरमध्ये जोरदार पाऊस

News Desk

माथेरानची मिनी ट्रेन पुन्हा घसरली

News Desk

मुंबईत जोरदार पाऊस, रेल्वेची वाहतूक विस्कळीत

News Desk
देश / विदेश

मोदी, शहा नथुरामचे वारसरदार

News Desk

पाटणा( वृत्तसंस्था)-बिहारमधील सध्याच्या राजकीय भूकंपाचे सर्व खापर नितीकुमार यांच्यावर फोडत राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी मोदी व शहा यांनाही लक्ष्य केले आहे. ‘देशाला एकत्र आणण्यासाठी आज आपल्यात गांधीजी नाहीत, हे दुर्दैव आहे. मोदी आणि शहा नथुराम गोडसेच्या वारसदार असल्याचे लालू यांनी म्हटले आहे. बिहारमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडीनंतर लालू यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी, शहा यांच्यासह नितीशकुमार यांच्यावर टिकास्र सोडले. नितीशकुमार यांचाउल्लेख ‘भस्मासूर’ असा करत, ही मॅच फिक्स होती, आमचं काहीच चुकलेलं नाही, असा पवित्रा लालूंनी घेतला.

Related posts

ना आम्ही शिवसेनेला प्रस्ताव दिला, ना शिवसेनेने आम्हाला !

News Desk

गोपाल कृष्ण गांधी उपराष्ट्रपदासाठी विरोधकांचे उमेदवार

News Desk

सर्वोच्च न्यायालयाच्या प्रख्यात वकील इंदिरा जयसिंह यांच्या घरावर सीबीआयचा छापा

News Desk