HW News Marathi
मुंबई

मुंबईत जोरदार पाऊस, रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबई | मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल १५ ते २० मिनिटे उशीराने धावत आहेत. त्यामुळे चाकरमान्यांना कार्यालयांमध्ये पोहचण्यास विलंब होत आहे. शहरात सखल भागांमध्ये पाणी साचल्याने रस्ते वाहतुक देखील मंदावली आहे. पुढील पाच दिवसात मुंबईसह कोकणात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

मुंबईच्या डबेवाल्यांना डबेवाला असोसिएशन कडून आज सकाळी ७ वाजताच घरातून डबे न घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्यामुळे आज मुंबईत डबेवाल्यांची सेवा बंद ठेवण्यात आली, असल्याची माहिती डबेवाला असोसिएशनचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी दिली आहे. गेल्या २४ तासात मुंबईत १६५.८ मिमी तर उपनगरात १८४.३ मिमी पावसाची नोंद आणि विरारमध्ये २४ तासात २३५ मिमी तर वसईत २९९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

बोरिवली ते विरार रेल्वे सेवा पूर्णपणे बंद

मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसामुळे बोरिवली ते विरार लोकल सेवा पुर्णपणे बंद आहे. नालासोपा-यासह काही स्टेशनवरील ट्रॅकवर पाणी साचले आहे. तर बोरिवलीपासून विरार अप-डाऊन लोकल सेवा ठप्प झाली आहे. बोरिवलीपासून चर्चगेटच्या दिशेने धावणा-या लोकल १५ ते २० मिनिटे उशीराने धावत आहेत. मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्येही मुसळधार पाऊस सुरू आहे. वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, दहिसरला पावसाने चांगलेच झोडपले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इमारत, दरड कोसळून तीन ठार

News Desk

डबलडेकर बस लवकरच होणार इतिहासजमा

Gauri Tilekar

उंदीर घोटाळ्यानंतर चहा घोटाळा उघडकीस

News Desk