HW News Marathi
मुंबई

पुण्यातील प्राध्यापकाची इराणी विद्यार्थीनीकडे शरीरसुखाची मागणी

पुणे येथील एका नराधम प्राध्यापकाने गुरु- शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य केले आहे. शिक्षणासाठी इराणमधून पुण्यात आलेल्या एका विद्यार्थीनीकडे त्याने थेट शरीरसुखाची मागणी केली. याबाबत कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मात्र अद्याप प्राध्यापकाला अटक करण्यात आलेली नाही.

पुण्यातील पौड रस्त्यावरील एका नामांकित महाविद्यालयात इराण देशातूनका विद्यार्थिनी पीएचडीप्रवेशासाठी आली होती. मंगळवार दुपारी साडेबारा ते दीड वाजण्याच्या सुमारास ती प्रवेशाबाबत महाविद्यालयाचे प्राध्यापक शिवाजी बोऱ्हाडे याला भेटली. मात्र बोऱ्हाडेने प्रवेश देण्यासाठी शारीरिक सुखाची मागणी केल्याचे तिने पोलिसात केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

या वेळी घाबरलेल्या तरुणीने याबाबत इराणमधील पालकांना कळवले. पालकांनी केलेल्या सूचनेनुसारतिने कोथरूड पोलीस स्टेशन गाठत घडल्या प्रकाराबाबत पोलिसांना अवगत करत, तक्रार दिली आहे. प्राध्यापक शिवाजी बोऱ्हाडेविरोधात कोथरूड पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

एबीव्हीपी आणि एसएफआयच्या कार्यक्रमांमध्ये मारामारी

News Desk

पतंगराव कदम यांचा अल्पपरिचय

News Desk

उद्यापासून रिक्षाचालकांचा बेमुदत संप

News Desk
देश / विदेश

नागरिकतेवर प्रश्न उपस्थित करणे यासारखे दुर्दैव नाही – हमीद अन्सारी

News Desk

नवी दिल्ली – जमावांकडून एखाद्या निष्पाप व्यक्तीची निर्घृणपणे करण्यात येणारी हत्या, ‘घरवापसी’, यांसारख्या घटना घडत असतील, तर ही भारतीय मूल्य कमकुवत होत असल्याची लक्षणे आहेत. तुमच्या भारतीय नागरिकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाणे, यासारखी दुसरी दुर्दैवी घटना नाही, अशा शब्दांत मावळते उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

सलग दुसऱ्यांदा उपराष्ट्रपतिपद भूषवलेल्या अन्सारी यांचा कार्यकाळ आज गुरुवारी संपत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसभा टीव्हीने त्यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी देशात सध्या सुरू असलेल्या घडामोडीवर भाष्य केले.

‘देशातील मुस्लिम समाजामध्ये सध्या भीती आणि असुरक्षेतेची भावना आहे. मुस्लिम समाजाकडे संशयाने पाहिले जाते. देशातील वेगवेगळ्या भागात मी गेलो, त्यावेळी मला असेच संशयाचे बोल ऐकायला मिळाले. बेंगळुरूला गेलो तेव्हाही मी हेच ऐकले आणि उत्तर भारतातून तर मोठ्या प्रमाणात असेचऐकायला मिळते,’ असेही अन्सारी म्हणाले. देशभर सुरू असलेल्या तीन तलाकवर बोलताना अन्सारी म्हणाले की, तीन तलाकच्या अनुचित प्रथेबद्दल दुमत होऊ शकत नाही. मात्र न्यायालयाने यात हस्तक्षेप करू नये, कारण कोणताही बदल समाजामधूनच होत असतो, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

Related posts

सीएए-एनआरसीविरोधातील रॅलीमध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणाऱ्या तरुणीला जामीन

News Desk

न्यूझीलंडमध्ये अंदाधुंद गोळीबार हत्याकांडानंतर सेमी ऑटोमॅटीक रायफल्सच्या विक्रीवर बंदी

News Desk

जम्मू-कश्मीरमच्या कुलगाममध्ये ५ दहशतवाद्यांचा खात्मा

News Desk