HW News Marathi
मुंबई

मरण्यासाठीही आता ‘आधार’ हवे

नवी दिल्ली – रेशन कार्डपासून ते सिम कार्डपर्यंत सर्वच ठिकाणी आधार सक्ती करण्यात आल्याने आधारविना जगता येणार नाहीच; पण आता आधारिवना मरणेही त्रासाचे होणार आहे. कारण मृत्यू प्रमाणपत्रासाठीही आधार सक्तीचा निर्णय केंद्राने घेतला असून १ ऑक्टोबरपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या रजिस्ट्रार जनरल इंडियाने पत्रक काढून मृत्यूच्या दाखल्यासाठीच्या नवीन नियमाची माहिती दिली. मृत्यूचा दाखला काढताना मृताचाआधार क्रमांक द्यावा लागणार आहे. त्यामुळे मृताच्या आधार कार्डचा गैरवापर होणार नाही. तसेच त्या व्यक्तीविषयीची माहितीही सरकारकडे उपलब्ध असेल, असे सूत्रांनी सांगितले. तसेत मयत व्यक्तीचे ओळख पटवण्यासाठी विविध कागदपत्रे सादर करण्याची गरज राहणार नाही, असेहीअधिकाऱ्यांचे मत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व पटवण्यासाठी महाराष्ट्र पोलीस इंटरनॅशनल मॅरेथॉनचे आयोजन

swarit

विधानसभा अध्यक्षांच्या अविश्वास ठरावाच्या मुद्यावरून दोन वेळा सभागृह तहकूब

News Desk
महाराष्ट्र

अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी सायकलवरून वाटले सातबारा

News Desk

अकोला – मंगळवारी महसूल दिनानिमित्त स्वत: येथील जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय शेतकऱ्यांच्या वेषात अकोला तालुक्यातील चांदूर गावात सायकलने गेले आणि त्यांनी शेतकऱ्यांना संगणकीकृत सात-बारा उताऱ्यांचे वितरण केले.

सात-बारा हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे. त्यामुळे शासनाने सातबारा उताऱ्यांचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला. काही जिल्ह्यांत हे काम अद्याप अपूर्ण असले, तरीही अकोला जिल्ह्यात ते पूर्ण झाले असून, हा संगणकीकृत सात-बारा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. मंगळवारी सकाळी ९ वाजता जिल्हाधिकारी सायकलने चांदूर गावात पोहचले. या वेळी त्यांनी संगणकीकृत सात-बाराचे शेतकऱ्यांना वितरण केले. शेतकऱ्यांशी संवाद साधून, त्यांच्या अडचणी जाणून घेणे व त्यांचे मनोधैर्य वाढविणे, हादेखील या उपक्रमामागील उद्देश आहे.

Related posts

संसदेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलैपासून सुरू होणार!

News Desk

सांगली जिल्ह्यातील बाबरवस्ती शाळा आदर्श पुरस्काराने सन्मानित

News Desk

MPSC पुस्तके तोंडावर फेकून आंदोलन करणार ! राम सातपुतेंचा इशारा

News Desk