HW News Marathi
मुंबई

मरण्यासाठीही आता ‘आधार’ हवे

नवी दिल्ली – रेशन कार्डपासून ते सिम कार्डपर्यंत सर्वच ठिकाणी आधार सक्ती करण्यात आल्याने आधारविना जगता येणार नाहीच; पण आता आधारिवना मरणेही त्रासाचे होणार आहे. कारण मृत्यू प्रमाणपत्रासाठीही आधार सक्तीचा निर्णय केंद्राने घेतला असून १ ऑक्टोबरपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या रजिस्ट्रार जनरल इंडियाने पत्रक काढून मृत्यूच्या दाखल्यासाठीच्या नवीन नियमाची माहिती दिली. मृत्यूचा दाखला काढताना मृताचाआधार क्रमांक द्यावा लागणार आहे. त्यामुळे मृताच्या आधार कार्डचा गैरवापर होणार नाही. तसेच त्या व्यक्तीविषयीची माहितीही सरकारकडे उपलब्ध असेल, असे सूत्रांनी सांगितले. तसेत मयत व्यक्तीचे ओळख पटवण्यासाठी विविध कागदपत्रे सादर करण्याची गरज राहणार नाही, असेहीअधिकाऱ्यांचे मत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुशांतच्या आत्महत्येची चौकशी सीबीआयकडे सोपवावी, रियाची अमित शाहांकडे मागणी

News Desk

बेस्ट, रेल्वे, मोनो आणि मेट्रो वाहतुकीसाठी एकच तिकीट

News Desk

नगरसेविका पत्नीच्या डोक्यात नारळ मारून प्रचाराला सुरूवात  

News Desk