HW News Marathi
मुंबई

रेल्वे तिकीट आरक्षणासाठी आधारकार्ड बंधनकारक

मुंबई रेल्वे तिकीट ऑनलाईन आरक्षित करण्याठी आधारकार्ड बंधनकारक करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासने घेतल्याने तिकीट दलाली संपुष्टात येणार आहे. अशी माहिती रेल्वे प्रशासनने दिली आहे.

यापुढे रेल्वे तिकीट काढण्यासाठी आधारकार्ड बंधनकार आहे. जर आधारकार्ड नसल्यास रेल्वे तिकीट खरेदी करता येणार नाही. यामुळे एकगठ्ठा रेल्वे तिकीट खरेदी करणा-या दलाली बंद होईल. तसेच रेल्वे तिकिटांवर सवलत मिळवण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना येत्या 1 एप्रिलपासून आपला आधार क्रमांक द्यावा लागणार आहे.

तीन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबवली जाणार आहे. आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर लॉगइन करण्यासाठी आधार क्रमांकाची आवश्यकता भासणार आहे. यासाठी रेल्वे प्रशासन सॉफ्टवेअर तयार करत असल्याची माहिती आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

वांद्रे प्रकरण : आदित्य ठाकरेंच्या ट्विटवर हरभजन सिंहने दिले उत्तर

News Desk

सीएसटीजवळ लोकल घसरली

News Desk

शिवस्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम रद्द

News Desk
क्राइम

पतीने पत्नीला चालत्या रेल्वेखाली ढकलून दिले

News Desk

संतप्त पतीने पत्नीला लोकलमधून फेकले

रेल्वे बलाच्या शिपायाने वाचवले महिलेचे प्राण

मुंबई : पत्नीवरील अनैतिक संबंधाच्या संशयावरूनचा वाद विकोपाला गेल्याने पतीने पत्नीला धावत्या रेल्वेतून खाली फेकल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे. या दुर्घटनेत सुनिता रोकडे ही महिला जखमी झाली आहे. दुर्घटनेप्रसंगी रेल्वे बलाच्या राधेश्याम गुर्जर यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे रोकडे यांना वेळीच उपचार मिळाल्याने त्यांना वाचवण्यात यश आल्याचे डॅाक्टरांकडून सांगण्यात आले.

रबाळेमध्ये सुनिता दोन मुले आणि नवरा अब्दुल हमीद शेख याच्यासोबत मागील तीन वर्षांपासून राहते. सुनिताचे यापूर्वीही एक लग्न झाले असून तिला पाच मुले आहेत. मात्र नवऱ्याशी न पटल्याने सुनिता कालांतराने दोन मुलांसह वेगळी राहत होती. त्यानंतर तीन वर्षांपूर्वी तिने अब्दुल शेख याच्याशी दुसरे लग्न करून ती रबाळे येथे राहत होती. मात्र व्यसनाच्या आहारी गेलेला शेख वारंवार सुनिताच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. यावरून दोघांमध्ये सतत वाद व्हायचे. शुक्रवारी सायंकाळी घणसोली येथून कामावरून सुटलेल्या सुनिताचा अब्दुलने पाठलाग केला. त्यावेळी घरी परतताना दोघेही ठाण्याला जाणाऱ्या एकाच लोकलमध्ये चढले. रेल्वेच्या दरवाजातच दोघांचे भांडण सुरू होते. त्यावेळी राग अनावर झालेल्या अब्दुलने धावत्या लोकलमधून सुनिताला ढकलून दिले. रेल्वेतील इतर प्रवाशांनी हा प्रकार पाहून आरडाओरडा केला. त्याचवेळी रबाळे स्थानकावर अब्दुलने धावत्या रेल्वेतून उडी टाकून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी त्याला रेल्वे सुरक्ष बलाच्या हवाली करत घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यावेळी घणसोली स्थानकात गस्तीवर असलेले रेल्वे बलाचे शिपाई राधेश्याम गुर्जर यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी महिला जिवंत असल्याचे लक्षात आल्यानंतर गुर्जर यांनी क्षणाचाही विचार न करता, ठाण्याला जाणाऱ्या रेल्वेच्या पटरीवर उभे राहून रेल्वे थांबवली. त्याच रेल्वेतून जखमी सुनिताला रबाळे स्थानकावर नेले. रबाळे स्थानकावरून राधेश्यामने सुनिताला रिक्षाने जवळील शासकीय रुग्णालयात दाखल केले.

Related posts

नक्षलींशी लढताना २४ वर्षिय पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू

News Desk

आयएएस अधिकारी लाच घेताना रंगे हात अटक

News Desk

अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याच्या फोनने खळबळ!

News Desk