HW News Marathi
मुंबई

लोकशाही संवर्धनाची जबाबदारी आता पत्रकारांवर  – विवेक पंडित

नागनाथ बाबर

पालघर- सध्या सरकार आणि न्यायपालिकेकडून अपेक्षित कामे केली जात नसल्याचे चित्र आहे, त्यामुळे लोकशाही संवर्धनाची जबाबदारी आता पत्रकारांवर आली आहे, असे प्रतिपादन श्रमजीवी संघटनेचे संस्थापक तथा माजी आमदार विवेक पंडित यांनी केले.

विक्रमगड येथे आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात पंडित बोलत होते. ‘राजकीय पक्ष, संघटनांच्या पत्रकारांकडून अपेक्षा’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते.

विधिमंडळाने कायदे आणि धोरणांची निर्मिती केल्यानंतर त्याची अंमलबजावणी कऱण्याची जबाबदारी सरकार आणि प्रशासनाची असते. त्यानंतर सरकारच्या कामकाजावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी विधिमंडळ आणि न्यायपालिकेची आहे. मात्र या तीनही मंडळांकडून अपेक्षित काम होत नसल्याची खंत पंडित यांनी व्यक्त केली. विधिमंडळावर निवडून जाणाऱ्या बहुतांश सदस्यांना ते कायदेमंडळाच्या यंत्रणेचे घटक असल्याचे गांभीर्य नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

विधिमंडळच कर्तव्यात अकार्यक्षम ठरत असल्याने सरकार स्वतःच्या सोयीचे कायदे बनवत आहे. परिणामी न्यायपालिकेचा अवास्तव हस्तक्षेप वाढत असल्याचे मत पंडित यांनी व्यक्त केले. ही सर्व परिस्थिती लोकशाहीला घातक आहे. त्यामुळे लोकशाही संवर्धनाची जबाबदारी आता पत्रकारांवर आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी स्ट्रक्चरल ऑडिटरच्या पोलीस कोठडीत १० एप्रिलपर्यंत वाढ

News Desk

मी निर्दोष, राहुल गांधींचा न्यायालयात दावा

News Desk

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, विठ्ठलवाडी-कल्याणदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली

News Desk