HW News Marathi
मुंबई

लिहून देतो, भाजपला पाठिंबा नाहीच – शरद पवार

अजय कल्याणे

– पाठिंबा काढणार हे शिवसेनेनंही लिहून द्यावं पवारांचं शिवसेनेला आव्हान

मुंबई – राज्यात शिवसेनेने पाठिंबा काढल्यानंतर राज्यातील भाजपा सरकार अल्पमतात आले तर, आम्ही पाठिंबा देणार नाही. हे मी लिखित मध्ये लिहून द्यायला तयार आहे. मात्र शिवसेनेनेही पाठिंबा काढणार हे लेखी द्यावं असं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केलं.

राज्यातल्या निवडणुकांच्या दरम्यान शिवसेनेने मुंबई आणि अऩ्य महापालिका निवडणुकीसाठी भाजपा बरोबरची युती तोडली आहे. दोन्ही पक्ष परस्परांवर टोकाची टीका करत आहेत. केंद्रात आणि राज्यात भाजपा बरोबर सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने सरकार नोटीस पिरीयडवर असल्याचं म्हटलंय. त्यापार्श्वभूमीवर शिवसेना सरकारचा पाठिंबा काढणार असल्याची चर्चा सुरू झाल्याचा पवारांच्या वक्त्व्याला संदर्भ आहे.

भविष्यातील राजकीय घडामोडींच्या अनुषंगाने शिवसेनेनं भाजपचा पाठिंबा काढल्यास राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला पाठिंबा देईल, असा अंदाज वर्तवला जातोय, त्या पार्श्वभूमीवर पवारांनी हा खुलासा केला. भाजपा राजकारणातल्या पारदर्शकतेबद्दल बोलते. पण सध्या प्रचारामध्ये ते भरपूर पैसा खर्च करतायत. मुंबईमध्ये हे सर्वत्र दिसतेय अशी टीका पवारांनी केली तसेच नोटाबंदीच्या निर्णयाचा सर्वत्र क्षेत्रांना फटका बसला. छोटया व्यवसायातील रोजगार कमी झाले. अनेक गावांना फटका बसला असे त्यांनी सांगितले. शिवसेनेकडून भाजपवर केले जाणारे आरोप आणि पवारांच्या आरोपांमध्येही साम्य असल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे अभ्यासवाटीकेची दुरावस्था

News Desk

छगन भुजबळ यांच्या प्रकृती बिघडल्यास सरकार जबाबदार | शरद पवार

swarit

मुलगी वाचवा मुलगी शिकवा संदेश देणारी मोटार सायकल रॅली

News Desk