HW News Marathi
मुंबई

विद्यापीठाचे निकाल लागणे कठिण, कॉँग्रेसने केला अनोखा निषेध

मुंबई: विद्यापीठाचे यंदाचे निकाल हे नियोजित वेळेत लागणार नाहीत, हे आता स्पष्ट झाले आहे, याचा निषेध करण्यासाठी ठाण्यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने तिरडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि कुलगुरू संजय देशमुख यांच्याविरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

मुंबई विद्यापीठाचे सर्व निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करावेत, असे स्पष्ट निर्देश कुलपती विद्यासागर राव यांनी कुलगुरुंना दिले असले, तरी या मुदतीत सर्व निकाल लागण्याची शक्यता नाही. वाणिज्य, कला आणि विधि विभागाचे निकाल आठवडाभर विलंबाने लागणार आहेत. विद्यापीठाच्या अंतर्गत येणाºया महाविद्यालयांच्या परीक्षा होऊन दोन महिने उलटले आहेत. मात्र, जाणून बुजून निकाल लावण्यात आलेले नाहीत, यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. ५०० हुन अधिक विषयांपेक्षा केवळ १०० परीक्षांचेच निकाल लागले आहेत. याकडे राज्य सरकार आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांनी लक्ष न दिल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याचा आरोप राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसने केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पिवळे मोजे घालून देशभरात अभियान, गिनीज बुक ऑफ़ रेकॉर्डची मान्यता

News Desk

छगन भुजबळ यांना केईएम हॉस्पिटल मध्ये हलवणार

News Desk

अमेझानच्या कर्मचाऱ्यांनी डिलिव्हरीसाठी पाठवलेल्या वस्तूची चोरी

swarit