HW News Marathi
मुंबई

साखर कारखाना घोटाळाप्रकरणी चौकशीची अण्णांची मागणी कोर्टाने फेटाळली

  • कारखान्यांविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर आदेश देणार

अजय कल्याणे – 8983240034

मुंबई – राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यात सुमारे 25 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला असून त्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुंबई उच्च न्यायालयात एका याचिकेद्वारे केली होती. शुक्रवारी न्यायालयाने अण्णांची याचिका फेटाळत, संबंधित कारखान्यांबाबत आधी तक्रार दाखल करणा त्यानंतर आदेश देऊ असे न्यायालयाने स्पष्ट केले.

सहकारी साखर कारखान्यांमधील या घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांच्यासारख्या काही राजकीय नेत्यांचा समावेश असल्याचा गंभीर आरोप हजारे यांनी केला होता. न्यायालयाच्या या निर्णयानंतर अण्णा हजारेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

वसई फाटा येथे पुठ्ठ्यांच्या गोदामाला भीषण आग

Gauri Tilekar

सामराज हाॅटेलला आग लागली

News Desk

नायर रुग्णालयातून चोरीला गेलेले बाळ सापडले

News Desk
देश / विदेश

रेल्वेगाडी 20 सेकंद लवकर सोडल्यामुळे प्रवाशांची माफी, जपानच्या खाजगी रेल्वेकंपनीने मागितली माफी

News Desk

सेकंदांचा हिशोब ठेवणाऱ्या जपानच्या वक्तशिरपणाचा जगाला पुन्हा एकदा प्रत्यय

टोकियो : ‘प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीर आहोत अशा अनेक प्रकारच्या अनाउंसमेंट आपण आल्यादिवशी भारतातील रेल्वे स्टेशन्सवर ऐकत असतो. भारतातल्या रेल्वेगाड्या उशीराने धावणे अथवा रद्द होणे आपल्यासाठी नवीन नाही. त्यातच एखादी गाडी वेळेत प्लॅटफॉर्म वरुन सुटली तर आपल्याला आश्चर्य़ाचा धक्का बसतो. मात्र जपानमध्ये काहीसा वेगळा प्रकार घडलाय. जपानमध्ये एका खाजगी कंपनीची रेल्वेगाडी वेळेच्या २० सेकंद आधी सुटल्यामुळे या कंपनीने दिलगीरी व्यक्त केली आहे. टोकियोच्या मिनामी नागारेयामा या रेल्वे स्टेशनवरुन सुकुबा एक्सप्रेस या गाडीची सुटण्याची वेळ ९ वाजून ४४ मिनीटं ४० सेकंद अशी होती. मात्र मंगळवारी या गाडीने २० सेकंद लवकर प्लॅटफॉर्म सोडला. या घटनेनंतर संबधित कंपनीने माफी मागत याबाबत कर्मचाऱ्यांना तंबी दिली असल्याचं एका प्रेस रिलीजदवारे नमुद केले. गाडीच्या मोटरमनने गाडीचे वेळापत्रक नीट तपासलं नसल्यानं हा प्रकार घडल्याचं स्पष्टिकरण या कंपनीने दिले आहे. विशेष म्हणजे ही गाडी सुटल्यानंतर लगेचच ४ मिनीटाला दुसरी गाडी होती. मात्र तरीही आपली चुक मान्य करत या कंपनीने प्रवाशांची माफी मागितली. या घटनेमुळे सेकंदांचा हिशेब ठेवणाऱ्या जपानच्या वक्तशिरपणाची प्रचिती पुन्हा एकदा जगाला आली आहे.

Related posts

खताच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना अनुदान द्या, केंद्र सरकारकडे चंद्रकांत पाटील यांची मागणी

News Desk

जी-२३ नेत्यांची कटकारस्थाने मोदी-शहांच्या इशाऱ्यावर! – नाना पटोले

Aprna

महाशिवरात्री निमित्ताने देसभरात उत्साह

swarit