HW News Marathi
मुंबई

#26/11Attack : मुंबईतील दहशतवादी हल्ला देश कधीच विसरू शकत नाही!

नवी दिल्ली | २६/११चा मुंबई हल्ला संपुर्ण देश कधीच विसरू शकत नाही, आणि त्यांच्या गुन्हेगारांना शिक्षा देण्याचे काम देशाचे संविधान करणार आहे. मी संपुर्ण देशवायी यांना विश्वास देतो की, काँग्रेसने भाजपच्या सर्जिकल स्ट्राइकनंतर संपुर्ण देशाला अभिमान वाटत होता. तेव्हा काँग्रेसने आमच्यावर टीका केली होती.

मोदींनी या सभेत मुंबईमधील २६/११ दहशतवादी हल्ल्यावरून काँग्रेस पार्टीवर जोरदार टीका केली आहे. २६/११ हल्ल्याने संपुर्ण देश हदरून गेला होता. त्यावेळी काँग्रेस राजकीय ध्येय साधण्यात व्यस्त होती. २६/११वरी दिल्ली ही रिमोट कंट्रोलवरून चाल होते. तेव्हा महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार असून देखील २६/११ मुंबईत दहशतवादी हल्ला करून आपल्या देशातील लोकांना आणि जवानांना गोळ्या घालून ठार केले होते. आज (२६ नोव्हेंबर)ला १० वर्ष पुर्ण झाले आहेत.

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमध्ये भीलवाड जाहीर सभेत काँग्रेस पार्टीवर निशाणा साधला. मोदी म्हणाले की, काँग्रेस पार्टी मोदींची जात काय आहे ? जेव्हा देश पतंप्रधान परदेशात जातात. तेव्हा त्या देशातील लोकांना एकच जात दिसते आणि ती म्हणजे जे देशातील सव्वाशे कोटी हिंदुस्थानातील जनतेची आहे. तसेच पुढे मोदी असे देखील म्हणाले की,” मी कधी सुटी घेतली आहे हे तुम्ही कधी ऐकले का? किंवा मी आठवडाभरासाठी कुठे तरी गेलो आहे, असे तुम्ही कधी ऐकले का?”

पुढे मोदी यांनी म्हटले की, २०१४मध्ये आमची सरकार येण्याआधी शौचालयची सुविधा ४० टक्के देखील नव्हती. परंतु आमच्या ४ वर्षात मोदींने ४० टक्केहून ९५ टक्के इतपत देशभरात शौचालय बांधण्यात आले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा २०२०चा ‘गुढीपाडवा मेळावा’ रद्द

swarit

भुजबळांच्या प्रकृतीत बिघाड, जसलोक रुग्णालयात केल दाखल

News Desk

टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या तळमजल्यावर लागलेली आग आटोक्यात

News Desk