HW News Marathi
मुंबई

#26/11Attack : शहिदांच्या बलिदानाचा राज्य सरकारला विसर ?

मुंबई | मुंबईत झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला आज १० वर्ष पूर्ण झाली आहेत. आज (२६ नोव्हेंबर) विधानसभेत सरकारकडून २६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ठराव मांडला जाणे अपेक्षित होते. मात्र, सरकारकडून सभागृहात असा कोणताही ठराव मांडला गेला नाही. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला १० वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह संपूर्ण देशभरात या हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. मात्र, राज्य सरकारला याचा घटनेबाबत गांभीर्य असून त्यांना शहिदांच्या बलिदानाचा विसर पडला असल्याचे चित्र दिसून आले आहे.

त्यामुळे अखेर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहाच्या अध्यक्षांकडे शहिदांना श्रद्धांजली वाहण्याबाबत मागणी केली. ‘२६/११ च्या या हल्ल्यात शहीद झालेल्या अधिकाऱ्यांना आणि मृत्युमुखी पडलेल्या निरपराध लोकांना विधानसभेत श्रद्धांजली अर्पण करून त्यांचे स्मरण केले गेले पाहिजे’, असे विखे पाटील यांनी म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही विखे पाटील यांच्या मागणीला आपला पाठिंबा दर्शविला. त्यानंतर अध्यक्षांनी सभागृहात मुंबई २६/११ हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा निर्णय दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गुजरात, महाराष्ट्रात स्वाइन फ्लुचा कहर, आठशे लोकांचा बळी

News Desk

पुणे रेल्वे टीसीने केली प्रवाश्याला मारहान

News Desk

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर माजी नगरसेवकांना उद्धव ठाकरेंनी दिला ‘हा’ कानमंत्र

Aprna