HW News Marathi
मुंबई

विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून ३७० झाडांचे वृक्षारोपण

मुंबई | जाणीव चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित ‘जाणीव वसुंधरेची ‘ या प्रकल्पा अंतर्गत लोकनायक जयप्रकाश नारायण कुष्ठरोग हॉस्पिटल, वसई येथे वृक्षारोपणाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये जाणीव ट्रस्टचे पदाधिकारी, साठ्ये महाविद्यालयाच्या NSSयुनिट व Ncc युनिटचे विध्यार्थी, साठ्येचे माजी विद्यार्थी , वर्तक कॉलेज, सेंट पीटर्स कॉलेज, न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज अशा विविध संस्थांमधून १२५ विद्यार्थ्यांनी श्रमदान केले.

यावेळी ३७० झाडांचे वृक्षारोपन करण्यात आले. यामध्ये मोगरा व आंबा या झाडांचा समावेश होता. लोकनायक जयप्रकाश नारायण कुष्ठरोग निर्मुलन संस्था यांनी ही रोपे उपलब्ध करून दिली होती . डॉ जगदीश सामंत यांना आदरांजली वाहून सर्व स्वयंसेवकांना विविध गटांमध्ये विभागणी करून झाडे व हत्यारे घेऊन सर्वजणांनी सकाळी साडेदहा च्या सुमारास वृक्षारोपणाला सुरवात केली. दीड वाजेपर्यंत वृक्षारोपण केले व सर्वांनी तेथे एकत्रित भोजनाचा आनंद घेतला व पुन्हा जोमाने साडेचार वाजेपर्यंत वृक्षारोपण केले, त्यानंतर लोकनायक ट्रस्टच्या ट्रस्टींनी मुलांशी सुसंवाद साधत वृक्षारोपणाची आपल्याला प्रदूषणावर तसेच ग्लोबल वॉर्मिंग वर मात करण्यासाठी आज आपण केलेले काम किती प्रशंसनीय आहे हे सांगत आपण सर्वांनी लावलेल्या झाडांची जवाबदारी संस्था घेईल व आपण सर्वांनी वेळात वेळ काढून येथे येऊन झाडांची काळजी घ्यावी याची सर्वांना जाणीव केली, सर्व उपस्थितांनी ही जवाबदारी आम्ही घेऊ असे आश्वासन दिले, त्यानंतर सुनिल पाठक (ट्रस्टी, जाणीव) यांनी डॉ सामंत यांचा वसा आपण चालवत आहोत असे सांगत सर्वांना ट्रस्ट व ट्रस्टच्या कार्यक्रमाबद्दल माहिती दिली व कार्यक्रमाच्या नियोजन व त्यामागील उद्दिष्टांची सर्वांना माहिती दिली.

मुंबई जिल्हा समन्वयक NSS विनोद गवारे (सहाय्यक प्राचार्य साठ्ये महाविद्यालय) यांनी उस्फुर्तपणे प्रेरणागित घेत आपली व समाजाच्या प्रति असलेली बांधिलकी दाखवून दिली. प्रा बबन मोहिते, सचिन शिगवण व प्रा गौरांग राजवडकर , प्रा कस्तुरी मेढेकर (साठ्ये महाविद्यालय), जिल्हा समन्वयक प्रा भीमराव पेडकर वर्तक कॉलेज, प्रा वैती सेंट पीटर कॉलेज, प्रा अभ्यंकर न्यू इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेज यांनी सर्वांना मार्गदर्शन केले, जाणीव ट्रस्ट च्या वतीने सर्वांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. जाणीव ट्रस्टच्या सुनील पाठक यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी योगेश पाटील, डॉ परुळेकर (लोकनायक जयप्रकाश नारायण ट्रस्ट) व राम परब, आरती पाठक (ट्रस्टी जाणीव) आणि मयूर पवार या सगळ्यांनी बहुमूल्य सहकार्य केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

श्रीदेवींच्या अंत्यदर्शनासाठी बॉलिवडू कलाकार आणि चाहात्यांची गर्दी

News Desk

मध्य रेल्वेचा आज विशेष मेगाब्लॉक

News Desk

अंधेरी, प्रिंटींग प्रेसला लागली आग, एकाचा मृत्यू

swarit
राजकारण

महाआघाडीचा निर्णय १० डिसेंबरला ?

News Desk

नवी दिल्ली | आगामी लोकसभा निवडणुकीला अवघ्ये पाच महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. सध्याच्या मोदी सरकारला निवडणुकीत टक्‍कर देण्यासाठी विरोधी पक्षांसह सर्व पक्ष पुन्‍हा एकत्र येत आहेत. टीडीपीचे नेते आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी सांगितले आहे की, महाआघाडीचा अजेंडा ठरवण्यासाठी येत्‍या १० डिसेंबर रोजी विरोधी पक्षातील प्रमुखांची बैठक होणार आहे.

टीडीपी नेत्यांनी यावेळी आम्‍हाला फक्‍त निवडणुकीसाठी पंतप्रधान नको आहे. जे पंतप्रधान फक्‍त निवडणुकीचा प्रचार करतात असे पंतप्रधान आम्‍हाला नको आहेत. देशात नवे बदल आणणारा आणि बदल घडवणारा पंतप्रधान आम्‍हाला हवा असे त्यांनी माध्यमांशी बोलताना स्‍पष्ट केले.

मागील काही महिन्‍यांपासून चंद्रबाबू नायडू भाजप विरोधी पक्षातील नेत्यांसोबत चर्चा करीत आहेत. मागील काही दिवसापूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्‍वामी, माजी पंतप्रधान एच. डी. देवगौडा, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममत बॅनर्जी, बसपा अध्यक्ष मायावती, सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव , डीएमकेच एम. के. स्‍टालिन, दिल्‍लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी चर्चा केली आहे. येत्या १० डिसेंबर रोजी होणार्‍या बैठकीसाठी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, जनता दल (सेक्यूलर), बसपा, सपा, आप पक्षाचे वरिष्ठ नेते या बैठकीला हजर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Related posts

राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेचा समारोप तर लोकसभेच्या प्रचाराला सुरुवात

News Desk

अखेर मोहन जोशी ठरले पुण्यातील काँग्रेसचे उमेदवार

News Desk

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आमदार राजन साळवींची साडे चार तास चौकशी

Aprna