HW News Marathi
मुंबई

सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी दोघांना फाशी

ठाणे कचरा वेचणा-या दोन मुलींना नोकरीची आमिष देऊन सामूहिक बलात्कार करून एकीची हत्या केल्या प्रकरणी ठाणे जिल्हा न्यायालयाने गुरूवारी दोघांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.रहिममुद्दीन महफू शेख 24 आणि संदिप समाधान शिरसाठ असे आरोपीचे नाव आहेत.

ठाणे सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.सी. खलिपे यांच्यासमोर झाली. रक्ताचे डाग असलेले कपडे, हत्येसाठी वापरलेली हत्यारे, फिर्यादी आणि ११ साक्षीदारांची साक्ष ग्राह्यमानून या दोघांना दोषी ठरवण्यात आले. दोघांनाही ३०२ कलमान्वये फाशीची शिक्षा आणि प्रत्येकी ५ हजार रुपये दंड, ३७६ कलमान्वये जन्मठेप आणि प्रत्येकी ५ हजार रुपये दंड तसेच ३२६ कलमान्वये १० वर्षे शिक्षा आणि प्रत्येकी ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. तसेच दंडातील १५ हजार रुपये मृत तरुणीच्या वारसांना, तर उर्वरित १५ हजार रुपये पीडित फिर्यादीला देण्यास न्यायालयाने सांगितले आहे.

२०१२ मध्ये नवी मुंबईतील सीबीडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती. ९ मे २०१२ रोजी घाटकोपर येथील विद्या बनसोडे (२८) ही नवी मुंबई येथे राहणाऱ्या मैत्रिणीकडे आली होती. दोघीही कचरावेचक असल्याने त्या दिवशी दोघी वाशी रेल्वे स्टेशनजवळ बसथांब्यावर ये-जा करणाऱ्या लोकांकडे पैसे मागत असताना, दोघींना आरोपींनी नोकरी देतो, असे सांगून रिक्षात बसवून मुंबई-पुणे हायवेने जुईनगर ब्रिजजवळ नेले. तेथे रिक्षा सोडून सीबीडी येथील बोगद्यात त्यांना ते घेऊन गेले. तेथे दोघांनी त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला. तसेच त्यांनी त्या दोघींवर तीक्ष्ण हत्याराने वार केले.

याचदरम्यान, विद्याची मैत्रीण तेथून पळून जात असताना काही अंतरावर जाऊन बेशुद्ध होऊन पडली, तर विद्याचा जागीच मृत्यू झाला. दोघींचाही मृत्यू झाल्याचे समजून हे दोघे आरोपी पळून गेले.

विद्या हिच्या शरीरावर ८ ते १० आणि तिच्या मैत्रिणीवर ११ ते १२ वार करण्यात आले होते. याचदरम्यान, तेथून जाणाऱ्या एका रिक्षाचालकाने विद्याच्या मैत्रिणीला रुग्णालयात नेले. ती शुद्धीवर आल्यानंतर १० मे रोजी या प्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासादरम्यान पीडित आणि आरोपी अशा चौघांना तेथील एका सुरक्षारक्षकाने एकत्र पाहिले असल्याचे पोलिसांना सांगितले होेते

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राणीच्या बागेतील पेंग्विनच्या पिल्लाचा मृत्यू

swarit

महापालिकेच्या दुर्लक्षामुळे कोळीवाड्यात कच-याचे साम्राज्य

News Desk

सुशिक्षीत तरूणांना नोकऱ्यांऐवजी पकोडे तळण्याचा सल्ला देणे बेजबाबदारपणाचे लक्षण-सचिन अहिर

swarit
महाराष्ट्र

काँग्रेस उद्यापासून राज्यभर आंदोलन करणार

News Desk

रावसाहेब दानवेंची भाषा‘दानवा’सारखीः खा. अशोक चव्हाण

मुंबई राज्यातीलतूर उत्पादक शेतक-यांना शिवीगाळ करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भाषा दानवासारखी आहे, अशी खरमरीत टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

मुंबई येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांची भाषा दानवासारखीच आहे. भाजप नेत्यांच्या डोक्यात सत्तेची नशा गेल्याने ते बेताल वक्तव्ये करित आहेत. राज्यातला तूर उत्पादक शेतकरी सध्या प्रचंड अडचणीत असून त्या शेतक-यांची सगळी तूर खरेदी करून शेतक-यांना दिलासा देण्याऐवजी शेतक-यांना शिवीगाळ करित आहेत. सत्तेची नशा भाजप नेत्यांच्या डोक्यात गेल्याने ते वारंवार शेतक-यांचा अवमान करत आहेत. आता तर शेतक-यांना शिवीगाळ करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. राज्यातले शेतकरी भाजप नेत्यांची ही नशा उतरवतील असे खा. अशोक चव्हाण म्हणाले.

शेतक-यांना साले म्हणून संबोधणा-या दानवे यांच्याविरोधात काँग्रेस पक्ष राज्यभरात आंदोलन करणार असून दानवे यांना “साला दानवे”अशी पदवी काँग्रेसकडून देण्यात येणार आहे. भाजपला थोडीही लाज असेल तर त्यांनी रावसाहेब दानवेंवर कारवाई करावी आणि राज्यातील शेतक-यांची माफी मागावी असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Related posts

अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुप्पट मदत! – आरोग्यमंत्री  

Aprna

राष्ट्रवादीच्या वाताहतीला राष्ट्रवादीच जबाबदार !

News Desk

औरंगाबादच्या कचराकोंडीला राज्यसरकारही जबाबदार | उद्धव ठाकरे  

News Desk