HW News Marathi
मुंबई

राज्यात पुढील दोन वर्षात ७२ हजार जागांवर नोकरभरती

मुंबई | राज्य सरकार दोन वर्षात विविध विभागात सुमारे ७२ हजार जागा भरणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

आगामी दोन वर्षात दोन टप्प्यात ही भरती केली जाणार आहे. राज्यात नोकरभरती होत नसल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्याला उत्तर देताना मुख्य़मंत्र्यांनी ही माहिती दिली. पुढील दोन वर्षात दोन टप्प्यात नोकरभरती केली जाणार आहे. यामध्ये गृहविभागात सर्वाधिक १४ हजार जागा भरल्या जाणार आहेत. त्यापाठोपाठ ग्रामविकास विभागात दहा हजार जागा भरल्या जाणार आहेत.

जलसंधारण विभागात चार हजार २२३ जागा भरल्या जाणार आहेत. कृषी विभाग २५७२, पशु-१०४७, मत्स-१०९०, जलसंधारण-४२२३, नगरविकास विभाग २०१५ अशा सुमारे ३६ हजार जागा पहिल्या वर्षी भरण्य़ात येणार आहे. तर दुसऱ्या वर्षी ३६ हजार जागा भरल्या जाणार आहेत.

वरिष्ट जागा एमपीएससीद्वारे भरण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. शिक्षक भरतीबाबत मात्र त्यांनी गोलमाल उत्तर दिले. याबाबत शिक्षण विभाग निर्णय़ घेणार असून काही दिवसांपूर्वी शिक्षणमंत्री विनोद तावडे घेतील असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विसर्जनानंतर स्वच्छतेसाठी दादर चौपाटीवर पर्यावरण प्रेमी एकटले

swarit

संगम प्रतिष्ठान करणार गड- किल्ले संवर्धन

News Desk

आरपीएफ जवानाने वाचविले प्रवाशाचे प्राण

News Desk