HW News Marathi
मुंबई

दादरमध्ये कार्तिकी एकादशी निमित्त भव्य दिंडी सोहळा संपन्न

मुंबई | श्री संत कृष्णदास महाराज सत्संग,मुंबई आयोजित सोमवार सकाळी ९.०० वाजता कार्तिकी एकादशी निमित्त पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन कै मीनाताई ठाकरे फुलमार्केट ते श्री विठ्ठल मंदिर, डी एल वैध रोड,दादर पर्यंत करण्यात आले होते. सदर दिंडी एल्फिस्टन येथून सेनापती बापट मार्ग,दादर फुलमार्केट,कबूतरखाना,रानडे रोड,डी एल वैध मार्ग,श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे समाप्ती करण्यात आली.या दिंडी सोहळ्यात पारंपरिक पद्धतीने टाळ-मुर्दुगा च्या घोषात ही भव्य-दिव्य दिंडी निघाली होती फुलांची सजावट हे या दिंडीचे वैशिट्य होते.

सदर दिंडी सोहळ्यात फुलमार्केटचे अध्यक्ष मनोज पुंडे, कटफ्लोअर फुल मार्केटचे अध्यक्ष सोपान दुराफे,वारकरी संप्रदायाचे समस्थ वारकरी बांधव तसेच संत कृष्णदास महाराज सत्संग,मुंबई चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मंत्र्यांना सत्तेची मस्ती चढली,जेष्ठ नागरिकांना लिफ्टमधून काढले बाहेर ,विरोधकांच्या तीव्र प्रतिक्रिया

swarit

घाटकोपरमध्ये मनसेची पोस्टरबाजी, राम कदम यांची उडवली खिल्ली 

swarit

स्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार हे भारताचे कोहिनूर | सुधीर मुनगंटीवार

News Desk
महाराष्ट्र

दिव्यांगांकडून नाकर्त्या शिवसेना-भाजप सरकारला बांगड्यांचा आहेर – दिव्यांग सेना

News Desk

मुंबई | दिव्यांग सेनेकडून भांडुपमधील शिवाजी तलाव येथे दिव्यांगांच्या न्यायासाठी ‘भिख मांगो’ उपोषण करण्यात आले. यावेळी सरकारवर दिव्यांगांवरील डावलण्याच्या कृतीवर हल्लाबोल करण्यात आला. ‘भिख मांगो’ उपोषण दिव्यांग सेना मुंबई उपाध्यक्ष रश्मी कदम यांचा पुढाकाराने घेण्यात आला होता. पत्रकारांशी बोलतांना रश्मी कदम म्हणाल्या शिवसेना-भाजप दिव्यांगांसाठी केले काय असे प्रश्न केले. या शिवसेना-भाजप सरकार ने महाराष्ट्र मध्ये दिव्यांगांना रोजगार किती दिला ?

१ ऑक्टोबर २०१८ रोजी मुख्यमंत्र्यांनी दिव्यांग पेंशन मध्ये दिव्यांगांना भिख टाकण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा दिव्यांग या भाजप-शिवसेना सरकारवर खूप नाराज आहेत. आज दिव्यांगांना भिख मागण्याची वेळ या शिवसेना -भाजपाचा सरकार ने आणले आणि दिव्यांगांच्या मागण्या बृहन्मुंबई महानगरपालिका, इतर महानगरपालिका, नगरपरिषद आणि महाराष्ट्र सरकारने पुर्ण न केल्यास भिख मांगो आंदोलन असेच चालू राहील यांची शिवसेना-भाजप सरकारने नोंद घ्यावी आसे रश्मी कदम यांनी ठणकावून सांगितले. जर २ डिसेंबर २०१८ पर्यंत दिव्यांगांच्या मागण्या पुर्ण करा नाहीतर या भाजप-शिवसेना सरकार ला जागे करण्यासाठी दिव्यांग सेने तर्फे बांगड्यांचा आहेर येत्या ३ डिसेंबर रोजी “जागतिक दिव्यांग दिन” निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना भेट देण्यात येईल.

तसेच महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हा आणि गावातून महिला दिव्यांगांनाही मी रश्मी कदम स्वःता दिव्यांग असून सर्वांना आव्हान करते की, आपण ही बांगड्यांचा आहेर या सरकार ला पाठवा. दिव्यांग सेनेचे अध्यक्ष प्रसाद साळवी, सरचिटणीस रोहन सातार्डेकर यांनी ‘भिख मांगो’ उपोषणला हजेरी लावली. मुंबई अध्यक्ष मोहन गुरव, ठाणे जिल्हा अध्यक्ष मनोज सातोसे, रेहाना कुरेशी ठाणे जिल्हा सरचिटणीस, दिलीप कांबळे, अनिल शिगंणे, वैभव निळेकर, अमित जैस्वाल हे उपस्थित होते.

Related posts

मुंबईतील रस्ते सुधारणा कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

Aprna

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदी नाना पटोलेंची लागली वर्णी?

News Desk

झिशान सिद्दिकींची सोनिया गांधींकडे भाई जगतापांची तक्रार, कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

News Desk