HW News Marathi
मुंबई

पुन्हा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई । मंत्रालयामध्ये एका माजी सरकारी कर्मचाऱ्याने फिनेल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.मंत्रालयामध्ये शुक्रवारी (१२ ऑक्टोबर) ही घटना घडली. गेल्या काही दिवसांपासून मंत्रालयात आत्महत्याच्या संख्येत वाढ होत आहे. दिलीप सोनावणे असे या आत्महत्या करणाऱ्या माजी शिपाईचे नावे आहे.

दिलीप यांनी कामगार विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवालयच्या कार्यालयाला बाहेर फिनेल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. वेळीच दिलीप यांना फिनेल पिताना मंत्र्यालयातील पोलीस आणि कर्मचाऱ्यांनी पाहिले. पोलिसांनी दिलीप यांना त्वरित ताब्यात घेतले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिलीप यांनी सेवानिवृत्तीची निवड लवकर करण्यात आली. त्यामुळे दिलीप यांची कामगार विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवालयच्या अधिकाऱ्यासोबत वाद विवाद झाला. यानंतर दिलीप यांनी आत्महत्याचा प्रयत्न केला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आरे परिसरात अग्नितांडव

News Desk

सीएसएमटी पूल दुर्घटनेमुळे बंद केलेला रस्ता तब्बल ३६ तासानंतर पुन्हा सुरू

News Desk

कुर्ल्याच्या भुयारी मार्गातून प्रवास करताय सावधान !

News Desk
महाराष्ट्र

सांगलीत १४ वर्षीय मुलाला मगरीने पाण्यात ओढले

News Desk

सांगली | सांगलीच्या ब्रम्हणाळमध्ये शुक्रवारी कृष्णा नदीच्या पात्रात एका मगरीने १४ वर्षाच्या मुलाला पाण्यात ओढल्याची धक्कादायक घटना घडली. अचानक मगरीने हल्ला करत मुलाला पाण्यात ओढल्यामुळे परिसरात मगरीची दहशत निर्माण झाली आहे. गरमीचे प्रमाण वाढल्यामुळे कृष्णा नदीच्या पात्रात काही मुले पोहत असताना ही घटना घडली आहे. मगरीने ज्या मुलाला पाण्यात ओढले तो मुलगा बेळगावरुन आपल्या मामाच्या गावी आला होता. अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.

अपघाताची माहिती मिळताच वनविभागाचे एक पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने रात्री उशिरापर्यंत मुलाचा शोध घेतला परंतु अद्याप या मुलाचा शोध लागलेला नाही. रात्री साडेआठपर्यंत वनविभागच्या पथकाकडून मुलाचा शोध सुरु ठेवण्यात आला होता. रात्री उशीरा ही शोधमोहीम वनविभाकडून थांबविण्यात आली होती परंतु स्थानिकांनी मात्र अजूनही मुलाचा शोध सुरु ठेवला आहे. स्थानिकांनी या मुलाला मगरीने पाण्यात ओढताना पाहीले असल्यामुळे त्याचा शोध घेणे प्रशासनासाठी अधिकच आव्हानात्मक झाले आहे.

Related posts

पंडित नेहरूंवर टीका करणे राज्यपालांना शोभत नाही, नाना पटोलेंचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर हल्लाबोल!

News Desk

सोलापुरातील जि. प. शाळांच्या १६४ इमारती धोकादायक

News Desk

टाळ-मृदंगाच्या गजरात श्री संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान

News Desk