HW News Marathi
मुंबई

2014 पर्यंतच्या अनधिकृत झोपड्या अधिकृत करा!

मुंबई – रिपाईचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आपल्या वेगवेगळ्या वादग्रस्त आणि मिश्कील मागण्यांसाठी प्रसिद्ध आहेत. आताही त्यांनी अशीच काही अजब मागणी केली आहे. अनधिकृत झोपड्यांना अधिक्रुत करा ही त्यांची मागणी पूर्वीचीच आहे. पण या मागणीत त्यांनी थोडी भर टाकली आहे. त्यांनी थेट 2014 पर्यंतच्या झोपड्यांना अधिकृत करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीने त्यांनी स्वताच्या सरकारचीच कोंडी केली आहे. 2014 पर्यंतच्या झोपड्या अधिक्रुत करण्याची मागणी पुढे आल्याने आता 2017 पर्यंतच्या पण का नाही ही मागणी पुढे येण्याची दाट शक्यता आहे. आठवले यांनी आपल्या वोट बैंकेवर डोळा ठेवून ही मागणी पुढे रेटली आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूका डोळ्या समोर ठेवूनच आठवले यांनी जाणिव पूर्वक ही मागणी केली आहे. या पूर्वी 2000 पर्यंतच्या झोपड्या आघाडी सरकारने अधिक्रुत केल्या होत्या. त्याच प्रमाणे भाजप सरकारने 2014 पर्यंतच्या झोपड्या अधिक्रुत कराव्यात अशी आठवलेंची मागणी आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पालघर जिल्ह्यातील डहाणूत भूकंपाचे जोरदार धक्के

News Desk

फेरीवाला संरक्षण कायदा त्वरित लागू करा – संजय निरुपम..

News Desk

काँग्रेसचे कालिदास कोळंबकर शिवसेनेच्या वाटेवर

News Desk
मुंबई

भाजपच्या ‘आश्वासनाचा फुगा’ जनताच फोडेल

News Desk

भाजपच्या आश्वासनाचा फुगा जनताच फोडेल

मुंबई छत्रपतीं का आशीर्वाद चलो चले मोदी के साथ असे निवडणुक काळात ब्रीदवाक्य घेत सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांच्या स्मारकाची एकही वीट रचली नाही याचाच अर्थ हे सरकार भूलथापा देवून आपली पोळी भाजून घेण्यात यशस्वी झाले आहे. परंतु हा भूलथापांचा फुगा येत्या काळात जनताच फोडेल असा माझा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.

अरबी समुद्रामध्ये जाऊन पंतप्रधान मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे जलपूजन केले आणि इंदू मीलमध्ये जावून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे भूमिपूजनही केले. महाराष्ट्रात सत्ता येण्यासाठी या दोन महापुरुषांच्या स्मारकांचा मुद्दा भाजपाने घेतला आणि सत्तेतही आले. परंतु या सरकारने सत्तेत येताना महापुरुषांच्या स्मारकांना जेवढया पध्दतीने महत्व दिले तेवढे महत्व सत्तेत आल्यावर दिलेले नाही. एकीकडे महाराजांच्या नावाने सत्तेत यायचे आणि दुसरीकडे त्यांच्या स्मारकाची वीटही रचायची नाही हा महाराष्ट्रातील जनतेचा अपमान सरकारने केला आहे. निवडणूक काळामध्ये दिलेली आश्वासने या फक्त भूलथापाच होत्या हे आता जनतेच्या लक्षात आले आहे असा आरोपही मलिक यांनी केलाय.

Related posts

घाटकोपर ते वर्सोवा रोडदरम्यान मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड, प्रवाशांचे हाल

News Desk

मुंबईच्या हवेत वाढते धुरक्याचे प्रमाण

News Desk

नौदलाच्या गार्डची गोळी झाडून आत्महत्या

News Desk