HW News Marathi
मुंबई

‘Beach Please’ एक अनोखा उपक्रम

आरती मोरे | आठवडाभर विविध गोष्टींमध्ये गर्क असणारे आपण सुट्टीची आतुरतेने वाट पाहत असतो. सुट्टी म्हटलं की मस्तपैकी लोळायच, सकाळचा नाश्ता दुपारी, दुपारचं जेवण संध्याकाळी असाच आपला संपूर्ण दिवस निघून जातो. परंतु, सुट्टीच्या दिवशी सकाळी उठून काही काम करायला सांगितलं आणि ते ही सामाजिक तर आपला चेहरा बघण्यासारखा असेल ना..?

मल्हार कळंबे या तरुणाला जून महिन्यात इंडोनेशियामधील बाली शहरामध्ये स्कुबाडायव्हिंग व इतर गोष्टी करताना तेथील निसर्गसौंदर्य व समुद्र किनारे जवळून अनुभवता आले. मुंबईत आल्यावर गणेशोत्सवानंतर समुद्र किनाऱ्यावरील जे दृश्य पाहिलं. ते पाहूनआपल्या देशातील समुद्र किनारे व बाहेरील देशातील समुद्र किनारे यांची तुलना केली व त्यावेळी समजलं की आपणचं चुकतो आहोत,आपल्या अती प्लास्टिक वापरामुळे किनाऱ्यांची ही अवस्था झाली आहे. हे रोखण्यासाठी आपण आपल्यापरिने प्रयत्न करूया असा विचार मल्हारने केला. दादर पारसी युथ असेंब्ली शाळेच्या मित्र मैत्रिणीनी समोर ‘बीच प्लीज’ ही कल्पना मांडली. मल्हारला देखील ही संकल्पना आवडली. त्यातूनच बीच प्लीज या संस्थेची स्थापना झाली.

‘बीच प्लीज’ या संस्थेंतर्गत ते ओहोटीच्या वेळा पाहून किनाऱ्यावरील कचरा प्रामुख्याने प्लास्टिक, कागद, दुधाच्या पिशव्या व इतर कचरा गोळा करण्याचे ४ ते ५ तास काम करतात. हे करताना कचरा उचलण्यासाठी लागणारे साहित्य, इतर गोष्टी कशा आणायच्या हा प्रश्न होता. परंतु संस्थेतील सर्वांच्या आर्थिक मदतीने तो ही प्रश्न सुटला. या सर्व कामामध्ये महानगरपालिकेचे पर्यवेक्षक तानाजी घाग यांची त्यांना मोलाची मदत मिळते.

आपण हे चित्र बदलण्यासाठी प्रयत्न करू या विचाराने ‘बीच प्लीज’ या संस्थेचा जन्म झाला. गेली ६८ आठवडे ही संस्था दादरचा समुद्र किनारा स्वच्छ करण्यासाठी दर रविवारी झटते आहे. आत्तापर्यंत या संस्थेद्वारे सुमारे ६०० टन कचरा गोळा करण्यात आला आहे. याच प्रभावशाली कार्यासाठी संस्थेचे संस्थापक मल्हार कळंबे यांना युनायटेड नेशन वाॅलेंटिअर आणि मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्लीच्या यु.एन लॉनमध्ये व्ही. अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. संपूर्ण भारतातून १० प्रभावशाली सामाजिक काम करणाऱ्या तरुणांची निवड करण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्रातून दोन तरुण निवडले गेले होते. या संपूर्ण १० जणांच्या चमूमध्ये मल्हार हा एकमेव मराठी सामाजिक कार्यकर्ता होता.

दर रविवारी आमच्यासाठी एक रीयूनियनच असते !

“दर रविवारी मी अनुभवतो आहे गेल्या रविवारी जेवढा कचरा साफ केला होता. तेवढाच कचरा पुन्हा साठतो आहे व एक दोघांनी कचरा साफ केल्याने ही परिस्थिती बदलणार नाही. यामध्ये जास्तीत जास्त तरुण वर्गाने सहभाग घेतला पाहिजे. तसेच या घाणीच्या साम्राज्यामुळे समुद्रातील जीवसृष्टीची धोक्यात आली आहे. दादरचा ५ किलोमीटरचा समुद्र किनारा साफ करण्यासाठी महानगरपालिकेचे ३५ कर्मचारी आहेत.

एवढा मोठा किनारा साफ करण्याचे आव्हान दररोज त्यांच्या समोर असते. त्यामुळे साफसफाई नसल्याचे खापर त्यांच्या माथी न फोडता आपणच जर प्लास्टिकचा वापर टाळला, घरच्या कचऱ्याचे ओला कचरा व सुका कचऱ्यांमध्ये वर्गीकरण केले तर समुद्र किनाऱ्याच्या सफाईचा प्रश्न निश्चितच सुटेल. कॉलेज व इतर गोष्टींमध्ये व्यस्त असणारे शाळकरी मित्र मैत्रिणी बीच प्लीजच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आलो. दर रविवारी आमच्यासाठी एक रीयूनियनच असते. सामाजिक उपक्रमाबरोबरच शाळेत केलेली तिचे मजामस्ती पुन्हा करायला भेटते”, असे मत मल्हारने व्यक्त केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनपा शाळेच्या मैदानावरील अतिक्रमण हटविले

swarit

आज अमित शहा घेणार उद्धव ठाकरेंची भेट

News Desk

मुंबईजवळ जहाजावरील तीन खलाशांचा मृत्यू

News Desk