HW News Marathi
मुंबई

विहिरीचा कठडा तुटून एका चिमुकलीसह दोन महिलांचा मृत्यू

मुंबई | विलेपार्ले येथे एका धार्मिक कार्यक्रमासाठी काही महिला मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास रुईया बंगलो, दीक्षित रोड, सॅटेलाईट हॉटेलजवळ जमल्या होत्या. मात्र, या ठिकाणी पूजेचा कार्यक्रम सुरु असताना विहिरीचा कठडा तुटून विहिरीत काही महिला व मुले पडली. ही घटना घडल्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस हजर झाले. विहिरीत पडलेल्यांना तातडीने बाहेर काढण्यात आले. जखमींना व्ही. एन. देसाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे.

सदर दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. माधवी पांडे (वय – ४९), रेणू यादव (वय २०) आणि ३ वर्षीय दिव्या अशी मृतांची नावे आहेत. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. याबाबत विलेपार्ले पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. काही महिला विलेपार्ले येथील रुईया बंगलो जवळील विहिरीवर असलेल्या लोखंडी जाळीवर बसून पूजा करत असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत सात महिलांना वाचविण्यात यश आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

येस बॅंकेला एसबीआयचा मदतीचा हात !

swarit

वसूल केलेला GST परत करणार का?: उद्धव ठाकरे

News Desk

२ तास उलटून गेले तरी चर्चा सुरूच, बेस्टचा संप आज तरी मिटणार का ?

News Desk