HW News Marathi
मुंबई

भारत पेट्रोलियमच्या प्लांटमध्ये स्फोट, माहुल गाव हादरले

मुंबई | चेंबूरच्या माहुलगाव येथील भारत पेट्रोलियमच्या प्लांटमध्ये जोरदार स्फोट होऊन आग लागली आहे. या स्फोटामुळे संपूर्ण चेंबूर हादरलं आहे. या स्फोटाचा आवाज प्रचंड मोठा होता. त्यामुळे सायनपर्यंत त्याचे हादरे जाणवले असून लोकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.

चेंबूर येथे बीपीसीएलमध्ये स्फोट झाला. यामुळे माहूलगाव परिसर हादरला आहे. रिफायनरी प्रकल्पापर्यंत ही आग पोहोचली आहे. या प्रकल्पाच्या जवळच मोनो रेल्वे व पूर्व मुक्त मार्ग आहे.

स्फोटाच्या आवाजाने आजूबाजूचा परिसर अतिशय धोक्याखाली आला होता. अग्निशामक दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून सध्या परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. तसेच आजूबाजूच्या परिसरातील लोकांना लवकरात लवकर तेथून बाहेर जाण्यास सांगितले जात आहे. तसेच सध्या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहे.

घटनास्थळाजवळ असणाऱ्या इतर प्रकल्पांना धोका पोहोचू नये म्हणून महानगरपालिकेचे अधिकारी आणि रिफायनरीच्या अधिकारी शर्थीचे प्रयत्न करत आहे. तसेच २०० ते ३०० कर्मचारी आतमध्ये अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुंबईतील सर्वात दाट परिसर म्हणून यास ओळखले जाते. याठिकाणी अनेक इतरही प्रकल्प आहेत, त्यामुळे आग वेळीच विझवणे शक्य झाले नाही तर इतर प्रकल्पांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच आजूबाजूला अनेक झोपडपट्ट्या असून अशी घटना घडल्यास त्यांच्या जीवाला मोठा धोका आहे. सध्या सहा रुग्णवाहिका देखील घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या स्फोटात ४ ते ५ जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एल्फिन्स्टन घटनेला वर्षपूर्ण, परिस्थिती ‘जैसे थे’

News Desk

Breaking News | शिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी गेलेल्या स्पीड बोटला अपघात

News Desk

सामराज हाॅटेलला आग लागली

News Desk